शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित नाही!

By admin | Published: January 18, 2016 3:33 AM

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहिलेला नाही. देशाला आतून आणि बाहेरून गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि याच कारणांमुळे अति सुरक्षित पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता,

एस.पी. सिन्हा,  पाटणानरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहिलेला नाही. देशाला आतून आणि बाहेरून गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि याच कारणांमुळे अति सुरक्षित पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, अशा शब्दांत राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी रालोआ सरकारवर हल्लाबोल केला.रविवारी राजदच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत लालूप्रसाद यादव यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. पक्षाध्यक्षपदी आरूढ होण्याची ही त्यांची नववी वेळ आहे. फेरनिवड झाल्यानंतर यादव यांनी राजदची राष्ट्रीय परिषद आणि नवव्या खुल्या अधिवेशनाला संबोधित केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित राहिलेला नाही. एकीकडे मोठमोठे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे दहशतवादी पठाणकोटसारख्या अति सुरक्षित क्षेत्रात घुसून आपले नापाक मनसुबे यशस्वी करीत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीतील विजय हा मर्यादित आहे. हा लढा अंतिम शेवटास नेला जाईल. अन्य राज्यांमध्येही बिगर भाजप पक्षांची आघाडी करू. दिल्लीत जनताभिमुख सरकार स्थापन करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या दिशेने मी स्वत: पुढाकार घेईन. बाराव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित अडचणी व गरिबांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत, असे यादव म्हणाले.तत्पूर्वी, लालूप्रसाद यादव यांची राजदच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड केली जाण्याची ही सलग नववी वेळ आहे. राजदच्या राष्ट्रीय परिषदेच्या खुल्या अधिवेशनात यादव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व माजी खासदार जगदानंद सिंग यांनी जाहीर केले. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी असेल.