शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

पाकने आखला डाव, अशी करणार मोदींची गोची

By admin | Published: October 09, 2016 8:49 AM

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडवार पडलेल्या आणि मोदींच्या बलुचिस्तानच्या मुदयावरून दुखावलेल्या पाकने आता भारता विरुद्ध गरळ ओकण्यासाठी नवी रणरनीती आखली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ९ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडवार पडलेल्या आणि मोदींच्या बलुचिस्तानच्या मुद्द्यावरून दुखावलेल्या पाकने आता भारता विरुद्ध गरळ ओकण्यासाठी नवी रणरनीती आखली आहे. संघाच्या विचारसरणीवरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. पाक मीडियानुसार संसदेच्या एका महत्त्वाच्या समितीने भारताच्या कमकुवत बाजू उघड करण्याच्या रणनीतीची शिफारस केली आहे.

या रणरनीतीनुसार २२ मुद्द्यांचा ७ पानी अहवालास पाक संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली आहे. यामध्ये मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि दलित हे भारतात कसे वेगळे पडत आहेत, याचे दाखले देत भारताची कमकुवत बाजू जगासमोर आणि भारतातील जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. असेही यामध्ये स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोध असणाऱ्या भारतीय जनतेचा फायदा करुन घेण्याचा पाकड्यांनी डाव आखला आहे. ७ पानी शिफारसीमध्ये म्हटले गेले आहे की, जम्मू-काश्मिरच्या मुद्यावर दोन्ही देशांचा एकमेकांवरील विश्वास कायम ठेवण्याबाबत आणि द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा व्हायला हवी. तर पाकने काश्मिरातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उचलायला हवा तसेचं पाकच्या धरतीवर दहशतवाद्यांना थारा देऊ नये. दरम्यान, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असेपर्यंत दोन्ही देशांतील संबंध सुधारणे अशक्य असल्याच मत पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी व्यक्त केले आहे.