शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदी स्वतःच स्वतःच्या पराभवाचा पाया रचताहेत; अरुण शौरींनी 'असं' मांडलं समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 18:04 IST

ही मोदींच्या आक्रमक राजकारणाची निर्मिती आहे, असे शौरी यांनी म्हटले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची कार्यपद्धती पाहता 2019 पर्यंत ते स्वत:च्या पराभवासाठी जमीन तयार करण्यात नक्कीच यशस्वी ठरतील, असा खोचक टोला भाजपाचे ज्येष्ठ अरूण शौरी यांनी लगावला. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी आगामी काळातील राजकीय परिस्थितीसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, मोदी सध्या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. मी तुमच्यापैकी प्रत्येकाला वेचून संपवेन, अशी भावना ते विरोधकांच्या मनात तयार करत आहेत. तुम्ही सर्वजण एकत्र आला नाही तर तुम्हाला आमच्यापासून धोका राहील, असा संदेशच त्यांनी आपल्या कृतीमधून विरोधकांना दिला आहे. त्यांच्या याच वृत्तीमुळे अनेक ठिकाणी नवे नेतृत्त्व उदयाला आले आहे. गुजरातमध्ये पाहिल्यास याचे प्रत्यंतर येऊ शकते. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर हे नेते शुन्यातून उदयाला आले आहेत. ही मोदींच्या आक्रमक राजकारणाची निर्मिती आहे, असे शौरी यांनी म्हटले. तसेच शौरी यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांकडे आश्वासक चेहरा नसल्याचा आक्षेपही खोडून काढला. या मुद्द्याचा नको इतका बागुलबुवा करण्यात आला आहे. १९७७ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची संपूर्ण देशात लाट असताना तेव्हा त्यांना हरवण्यासाठी कोणताच चेहरा नव्हता. लोकांनीच त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हरवण्यासाठी चेहऱ्याची गरज नाही, असे शौरी यांनी सांगितले. याशिवाय, २०१९ साठी भाजपच्या विरोधात आताच महाआघाडी स्थापन करणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. परंतु, मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशाचे पतन होईल, असे केवळ विरोधकांनाच वाटत नाही, तर भाजपच्या घटक पक्षांनाही वाटत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Arun Shourieअरुण शौरीNarendra Modiनरेंद्र मोदी