शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन; बांगलादेशातील हिंदूंबाबत दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 17:14 IST

बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

Mohammad Yunus spoke to PM Modi :बांगलादेशात सत्तांतरानंतर हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भारताने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडून पळ काढला होता. त्यानंतर लोकांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. त्यामुळे भारत सरकारने याबाबत बांगलादेशकडे याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता बांगलादेशातल्या अंतरिम सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बांगलादेश सरकारचे सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस हे माझ्याशी फोनवर बोलले. त्यांनी सद्यस्थितीवर विचार विनिमय केला असल्याचे म्हटलं आहे. यावेळी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबतही चर्चा झाली.

यावेळी बांगलादेशातील  लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील होण्यासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला आहे. तसेच, प्रोफेसर युनूस यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची हमी दिली. बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांशी बोललो आणि सर्व अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यावर भर दिल्याचे पंतप्रधान मोदींनी त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. बांगलादेशसोबतचे मजबूत संबंध अधिक सुधारण्यासाठी भारत सदैव तत्पर आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी हा फोन केला होता. सद्यस्थितीवर विचार विनिमय केला. लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले," असं पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली आहे. शेजारील देशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत १४० कोटी भारतीय चिंतेत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशNarendra Modiनरेंद्र मोदी