शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

मान्सून केरळमध्ये !

By admin | Published: June 09, 2016 6:22 AM

दुष्काळामुळे आभाळाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या नैऋत्य मान्सूनने अखेर सात दिवसांच्या विलंबाने केरळला धडक दिली

तिरुवनंतपुरम : दुष्काळामुळे आभाळाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या नैऋत्य मान्सूनने अखेर सात दिवसांच्या विलंबाने केरळला धडक दिली आहे. या राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे देशभरात पावसाळ्याची सुरुवात झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. पहिल्याच पावसाच्या तडाख्याने केरळमध्ये एकाला जीव गमावावा लागला.केरळ आणि लक्षद्वीपमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाच्या तिरुवनंतपुरम प्रादेशिक केंद्राचे प्रमुख के. संतोष यांनी केली आहे. मंगळवारच्या रात्रीपासून केरळच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भागासह मालदीव,केरळ, तामिळनाडू, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या तसेच मध्यमभागाकडे आगेकूच चालविली असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. यापूर्वी आयएमडीने ९ जून ही मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली होती. प्रत्यक्षात ८ जून रोजी मान्सूनसंबंधी तीनही परिमाणांची पूर्तता झाली. त्यामुळे त्याच दिवशी म्हणजे बुधवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा अधिकृतरीत्या करण्यात आली. (वृत्तसंस्था)>सोमवारी राज्यामध्ये...सध्याची अनुकूल परिस्थिती पाहता मान्सून येत्या ४ ते ५ दिवसात महाराष्ट्रात धडकेल, अशी आनंदाची बातमी पुणे वेधशाळेच्या संचालक सुनीतादेवी यांनी दिली. केरळनंतर आता पुढील ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, केरळ व तामिळनाडूचा उर्वरित भाग आणि दक्षिण आंध्रप्रदेशात सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती आहे़ त्यानंतर दोन-तीन दिवसांत तो राज्यभरात बरसू लागेल, असे सध्याचे चित्र आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूर येथे ९, रत्नागिरी ८, पणजी २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ साताऱ्यातही दमदार सरी कोसळल्या असून महाबळेश्वर चिंब भिजून गेले.