शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

'चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणला, काँग्रेसला पश्चाताप होईल'; किरेन रिजिजू यांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 8:06 PM

'तुम्ही देशाविरोधात काम करत आहात, त्यामुळे आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवल्याने काही होणार नाही.'

नवी दिल्ली: लोकसभेत केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरमयान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हा प्रस्ताव चुकीच्यावेळी आणला, याचा काँग्रेसला पश्चाताप नक्की होणार. यावेळी त्यांनी विरोधकांवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. तसेच, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर पूर्वोत्तरमध्ये 8000 हून अधिक दहशतवादी/कट्टरतावाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचेही सांगितले.

काँग्रेसला पश्चाताप होणारकिरेन रिजिजू यांनी यावेळी विरोधी आघाडीच्या नावावरही टीका केला. ते म्हणाले की, तुम्ही देशाविरोधात काम करत आहात, त्यामुळे आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवल्याने काही होणार नाही. हा अविश्वास प्रस्ताव हाणून पाडल्यानंतर आम्ही नवीन संसदभवनात शिफ्ट होऊ. या जुन्या संसद भवनात हा शेवटचा अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरल्याच्या घटनेचे आम्ही साक्षीदार होऊ. अविश्वास प्रस्ताव आणण्याचे काही कारण असायला हवे. काँग्रेसला पुढे याचा नक्कीच पश्चाताप होणार, अशी टाकीही त्यांनी यावेळी केली.

2014 नंतर ईश्यान्येतील परिस्थिती बदललीरिजिजू पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवादावर मोठा आळा बसला. पूर्वोत्तरमध्ये 8,000 हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. AFSPA चे एकूण कव्हरेज क्षेत्र 75% ने कमी केले. तुम्ही मणिपूरबद्दल बोलत असाल तर सर्व बाबी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही देशाची दिशाभूल करत आहात. 

ते दिवस गेले...2014 पूर्वी ईशान्येकडील अनेक लोकांना दिल्ली आणि देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये वांशिक भेदभाव आणि अत्याचारांचा सामना करावा लागायचा, 2014 नंतर परिस्थिती बदलली आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच DGP परिषद गुवाहाटीमध्ये झाली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी निर्देश दिले की, पोलिसांनी ईशान्येकडील लोकांच्या सुरक्षेवर विशेष भर द्यावा. ते दिवस गेले जेव्हा परकीय शक्ती भारताने काय करावे आणि काय करू नये हे सांगायचे. आज कोणतीही परदेशी शक्ती आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असंही रिजिजू यावेळी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी