शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस

By admin | Published: May 10, 2017 3:04 AM

अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यंदा देशात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यंदा देशात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला.हवामान खात्याने गेल्या १८ एप्रिल रोजी नैर्ऋत्य मान्सूनच्या पावसाचा प्राथमिक अंदाज जाहीर करताना यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असे म्हटले होते. गेल्या ५० वर्षांतील पावसाची सरासरी ८९ सेंमी गृहीत धरून त्याच्या तुलनेत पावसाचा कमी, जास्त किंवा सरासरीएवढा असा अंदाज वर्तविण्याची पद्धत आहे. यातही वर्तविलेल्या अंदाजाहून ५ टक्के कमी-जास्त पाऊस होण्याची शक्यता असते.भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मार्चपर्यंतच्या परिस्थितीनुसार १८ एप्रिलचा अंदाज वर्तवला होता. तेव्हापासून परिस्थिती अनुकूल झाल्याने सरासरीहून थोडा जास्त पाऊसही पडू शकतो.भारतात जून ते सप्टेंबर हा नैर्ऋत्य मान्सूनचा हंगाम असतो. वर्षभरातील ७० टक्के पाऊस या काळात पडत असल्याने शेतीचे गणित प्रामुख्याने या पावसावर ठरते. म्हणूनच चांगला पाऊस हा शेतीसाठी शुभवार्ता ठरतो. शेतीचे मुबलक उत्पादन हे एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ठरते. म्हणूच केवळ शेतकरीच नव्हे तर देशाचे शासक आणि अर्थतज्ज्ञही पावसाइतकेच पावसाच्या अंदाजाकडे डोळे लावून बसलेले असतात.