शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

शेतकऱ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 7:59 AM

दर झाला दुप्पट, आत्महत्येत मुलींचे प्रमाण वाढले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसंख्या वाढ व एकूण आत्महत्यांचे प्रमाण यांच्या दराला मागे टाकून देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यांनी शेतकरी आत्महत्यांनाही  मागे टाकल्याची आकडेवारी ‘आयसी३’च्या अहवालात समोर आली आहे.

एनसीआरबीच्या डेटावर आधारित “विद्यार्थी आत्महत्या : भारतात वेगाने पसरणारी महामारी” हे शीर्षक असलेल्या अहवालात भारतात आत्महत्या करण्याचा वार्षिक दर दोन टक्क्यांनी वाढला आहे. तर विद्यार्थी आत्महत्या करण्याचा दर दुप्पट म्हणजेच चार टक्के झाला आहे. २०२२ मध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांपैकी ५३ टक्के पुरुष विद्यार्थी होते. २०२१ आणि २०२२ मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ६ टक्क्यांनी वाढल्या असून, विद्यार्थिनींच्या आत्महत्या ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या किती?देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत ६२ टक्क्यांनी वाढ झाली असताना शेतकरी आत्महत्यांमध्ये १२ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२१ मध्ये १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर १०,८८१ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

महाराष्ट्रात काय?२०२१ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १,८३४ विद्यार्थांच्या आत्महत्या झाल्या. मध्य प्रदेशात १,३०८ आत्महत्या, तामिळनाडू १,२४६, कर्नाटकात ८५५ आत्महत्या झाल्या आहेत. या पाच राज्यांचा मिळून विद्यार्थी आत्महत्यांमध्ये ४६% वाटा आहे. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असूनही येथे विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण कमी आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थी