शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

‘पीएफआय’भोवती फास आवळला; एकाच दिवसात १५० पेक्षा अधिक ताब्यात, तर काहींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 6:17 AM

आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली आहे. याच पीएफआयवर पाच दिवसांपूर्वीही देशव्यापी कारवाई करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, आसाम आणि मध्य प्रदेश या सात राज्यांमध्ये तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही करावाई करण्यात आली. एनआयए नेतृत्वाखाली विविध तपास संस्थांच्या पथकांनी २२ सप्टेंबर रोजी देशातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत असल्याच्या आणि कट्टरवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपावरून पीएफआयविरुद्ध १५ राज्यांत छापेमारी केली होती. यात संघटनेचे १०६ नेते व कार्यकर्त्यांना जेरबंद करण्यात आले होते. पीएफआयचा सहभाग असलेल्या १९ प्रकरणांचा एनआयएकडून तपास सुरू आहे. 

मंगळवारी सात राज्यांच्या पोलिसांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात मंगळवारी छापे टाकले. आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात ५७ आणि दिल्लीत ३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय मध्य प्रदेशात २१, गुजरातमध्ये १० आणि कर्नाटकातही अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

पीएफआय आणि संलग्नित संघटनांनी देशातील विविध ठिकाणी केलेला हिंसाचार व या संघटनेतील सदस्यांच्या वाढत्या राष्ट्रविरोधी कृत्यांच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशात स्थानिक पोलीस, विशेष कृती दल (एसटीएफ) आणि दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) यांच्या संयुक्त पथकांनी छापेमारी केली, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. 

लवकरच संघटनेवर बंदी? 

  • पीएफआयची २००६ मध्ये केरळ राज्यात स्थापना केली होती. आपण वंचित गटांच्या सशक्तीकरणासाठी नव सामाजिक चळवळ राबवत असल्याचा पीएफआयचा दावा आहे. 
  • तथापि, पीएफआय इस्लामी कट्टरवादाचा प्रसार करत असल्याचा सुरक्षा संघटनांचा दावा आहे. पीएफआयविरुद्धच्या राष्ट्रव्यापी कारवाईनंतर या संघटनेवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. 

घरांमधून कागदपत्रे जप्तपोलीस पथकांनी २६ जिल्ह्यांत एकाच वेळी पीएफआयचे पदाधिकारी व सदस्यांची घरे व प्रतिष्ठानांवर छापे टाकून ५७ जणांना ताब्यात घेतले. छाप्यांमध्ये आढळलेली विविध कागदपत्रे व पुराव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान, आजच्या कारवाईबद्दल पीएफआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 

महाराष्ट्रातून २९ जण ताब्यात

  • राज्यातून पीएफआयशी संबंधित २९ जणांची धरपकड करण्यात आली. यातील काही जणांना न्यायालयात हजर करुन नंतर सोडून देण्यात आले.  औरंगाबादमधून सर्वाधिक १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. 
  • त्यातील १० जणांवर शहर पोलिसांनी १०७ कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करीत सोडून दिले. उर्वरित चार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत १० दिवसांसाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. 
  • ठाण्यातून चार, पुण्यातून सहा, अहमदनगरमधून दोन, तर जळगाव, मिरज आणि नवी मुंबई येथून प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रAssamआसाम