शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

महाराष्ट्रामध्ये पोलीस कोठडीतील कैद्यांचे मृत्यू सर्वाधिक

By admin | Published: March 22, 2017 12:49 AM

कोठडीतील कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मान्य केले.

नवी दिल्ली : कोठडीतील कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मान्य केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना वरील कबुली दिली.महाराष्ट्रात कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूंचे प्रमाण (पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू) काहीसे जास्त आहे. महाराष्ट्रात २०१३ मध्ये ३५ जणांचा कोठडीत मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये २१, तर २०१५ मध्ये १९ जण कोठडीत दगावले होते. हे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. कोठडीतील मृत्यूंना जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध त्वरित कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पुरेशी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली आहेत, असे रिजिजू म्हणाले.मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त आणि भाजपा सदस्य सत्यपाल सिंह यांनी रिजिजू यांची आकडेवारी खोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस देशात सर्वश्रेष्ठ पोलीस दल आहे, असे ते म्हणाले, तेव्हा काही सदस्यांना हसू फुटले. त्यावर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ‘आम्हाला तुमचीही (सत्यपालसिंह) आकडेवारी पाहावी लागेल,’ असे गमतीने म्हटले. तेव्हा सभागृहात पुन्हा हास्याची लकेर पसरली.मृत्यूची कारणे इतरही?-पोलिसांच्या ताब्यात झालेल्या कैद्यांच्या सर्व मृत्यूंना कोठडीतील मृत्यू म्हटले जात नाही. कारण यातील काही मृत्यू न्यायालयीन कोठडीत किंवा नैसर्गिक कारण अथवा आजारपणामुळे झालेले असतात, असे सत्यपाल सिंह यांचे म्हणणे होते. माजी केंद्रीय गृहसचिव व खा. आर. के. सिंह आणि झारखंड पोलीस दलाचे माजी पोलीस महासंचालक व खा. व्ही. डी. राम हे मात्र, सत्यपालसिंह यांच्या मताशी सहमत नव्हते. ते काही बोलू इच्छित होते. मात्र, अध्यक्षांनी त्यांना मुभा दिली नाही. दोन्ही भाजपाचे सदस्य आहेत.