शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
3
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
4
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
5
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
6
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
7
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
8
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
9
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
10
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
11
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
12
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
13
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
14
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
15
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
16
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
17
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
18
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
19
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
20
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

सरसकट दारूबंदीमुळे प्रश्न कदापि सुटणार नाहीत

By admin | Published: February 01, 2015 1:21 AM

सरसकट दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले.

सुरेश गुदले ल्ल पणजीसरसकट दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले. हिवरेबाजार (जि. अहमदनगर) येथील जलसंवर्धनाच्या कामामुळे देशभर परिचित झालेले पवार येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. गोवा आणि दारूच्या समीकरणाविषयी जगभर एक प्रतिमा तयार झाली आहे. गोवा म्हणजे मौजमजा, असेही म्हटले जाते. पोपटराव पवार यांनी व्यसनमुक्तीसाठीही काम केलेले असल्याने त्यांना दारूबंदी विषयावर बोलते केले. तेव्हा युरोपीयन देशांत सर्व कुटुंबीय एकत्र बसून दारू पितात. मात्र युरोप व भारतात मोठे सांस्कृतिक अंतर आहे. आनंद झाला म्हणून दारू प्यायची, मग नोकरी मिळाली यासारखी कारणेही पुरेशी ठरतात. दु:ख झाले म्हणून दारू पिली जाते. दोन्हीही बाबी अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नानाविध कारणांमुळे ‘डिप्रेशन’ वाढल्यानेही लोक व्यसनांच्या आहारी जातात, असे ते म्हणाले. शालेय स्तरावर व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगायला हवेत. हिवरेबाजार येथे आम्ही अशा प्रकारे प्रबोधन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधन करणे हाच व्यसनमुक्तीवर योग्य व शाश्वत पर्याय असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की शालेय मुलांना, तरुणांना काही वर्षांपूर्वी व्यायामशाळा, क्रीडांगणे, मनोरंजनाची सशक्त साधने यांसारखे अनेक पर्याय होते. त्यामुळे अन्य क्षेत्रांमध्ये तरुणाई गुंतली जात होती. मात्र आता शहरांतील चित्र बदलले आहे. अनेक औषधांमध्येही अल्कोहोलचा वापर केलेला असतो़ त्यामुळे पूर्ण दारूबंदीपेक्षा नियंत्रण महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नानाविध कारणांमुळे ‘डिप्रेशन’चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जाते. प्रबोधन हाच त्यावर उपाय आहे. - पोपटराव पवार, सामाजिक कार्यकर्ते