शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

इंदू सरकारमधील बहुतांश भाग काल्पनिक - मधुर भांडारकर

By admin | Published: July 13, 2017 5:48 PM

या चित्रपटातील बहुतांश भाग काल्पनिक असल्याचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 13 - गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात अडकलेल्या इंदू सरकार या चित्रपटात डिस्क्लेमर (जाहीर निवेदन) देण्यात येणार आहे. तसेच, या चित्रपटातील बहुतांश भाग काल्पनिक असल्याचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सांगितले आहे. 
इंदू सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी येथील पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, मी इंदू सरकार चित्रपटात डिस्क्लेमर देत असून यामध्ये चित्रपटातील अनेक घटना ह्या काल्पनिक आहेत, असे सांगण्यात येणार आहे.  
मी याधी सुद्धा सांगितले आहे की, या चित्रपटातील कथानक जवळपास 70 टक्के भाग काल्पनिक आहे, तर 30 भाग वास्तविक आहे. त्यामुळे यासंदर्भात या चित्रपटात डिस्क्लेमर दाखविले जाणार आहे.
तसेच, चित्रपटाचे निर्माते म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या वादामुळे इंदू सरकार चित्रपटाची खरी कहाणी गायब होत आहे. इंदु सरकारमधील कहानी ही आणीबाणीत अडकलेल्या पती-पत्नीच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट राजकारणावर नाही. याचबरोबर संजय गांधी यांची मुलगी आहे, असा दावा करणा-या एका महिलेने कायदेशीर नोटीस पाठविल्याप्रकरणी दिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाले की, त्या नोटीसला औपचारिकरित्या उत्तर देण्यात येईल. 
दरम्यान, दुसरीकडे, इंदू सरकार या चित्रपटातील 14 सीन्स कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाविरोधात मधुर भांडारकर रिवाइज कमिटीकडे जाणार असल्याचे समजते. इंदू सरकार चित्रपटातील काही संवादांनाही काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने चित्रपट दिग्दर्शकाला केली असून यामध्ये "भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया हुआ है", "और तुम लोग जिंदगीभर मॉं-बेटे की गुलामी करते रहोगे", असे संवाद आहे. तर, प्राइम मिनिस्टर, इंटेलिजन्स ब्युरो, किशोर कुमार असे काही शब्द गाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले होते की सेन्सॉर बोर्डाने आपले काम केले. त्यांनी यामध्ये केलेल्या काही सूचना मला मान्य नाहीत. त्यामुळे मी रिवाइजल कमिटीपुढे जाणार असल्याचे  सांगितले होते. 
 
आणीबाणीवर आधारित या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या भूमिका दाखवण्यात आल्या असल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला असून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी चित्रपट रिलीज होण्याआधी आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे. याचबरोबर या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते स्व. संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधीत असल्याचे दिसून येते. परंतु, सदरहू चित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्याची शंका खरी ठरली तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
इंदू सरकार हा चित्रपट 1975 च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात 21 महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
याचबरोबर इंदू सरकार हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.