शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

स्मशानभूमीत हायव्होल्टेज ड्रामा! 9 तास चितेवर ठेवला आईचा मृतदेह; संपत्तीसाठी मुलींचं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 13:00 IST

आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवला गेला आणि मुली भांडत राहिल्या. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात मार्ग निघेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमिनीच्या वाटणीवरून वाद झाला होता. आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवला गेला आणि मुली भांडत राहिल्या. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात मार्ग निघेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. जवळपास 8 ते 9 तास वाया गेले. या घटनेवरून लोक महिलेच्या मुलींवर टीका करत आहेत. 

मथुरेतील मसानी येथील स्मशानभूमीतून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे 85 वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर तिच्या तीन मुलींमध्ये जमिनीच्या हक्कावरून भांडण सुरू झाले आणि त्यामुळे अनेक तास महिलेवर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेले लोकही परत गेले. स्मशानभूमीत अनेक तास मुलींचा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. यामुळे लोकांना खूप वेळ वाट पाहावी लागली. पुष्पा यांना मुलगा नाही. त्यांना तीन मुली आहेत. मिथिलेश, सुनीता आणि शशी अशी मुलींची नावं आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या त्यांची मोठी मुलगी मिथिलेश यांच्या घरी राहत होती. मिथिलेशने आपल्या आईला आपल्या बाजुने वळवून घेऊन त्यांचं शेत विकल्याचा आरोप आहे. यानंतर पुष्पा यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. याची माहिती पुष्पा यांच्या इतर दोन मुली सुनीता आणि शशी यांना समजताच त्यांनीही स्मशानभूमी गाठली. 

मोठ्या बहिणीला दोष देऊन त्यांनी आईचा अंत्यविधी थांबवला. आईच्या मालमत्तेच्या वाटणीवरून दोन्ही बहिणींचे मोठ्या बहिणीशी भांडण सुरू झाले. आईची उरलेली संपत्ती आमच्या नावावर करा, तरच ते अंत्यसंस्कार करू, अशी मागणी सुनीता आणि शशी करू लागल्या. पण मिथिलेशला हे मान्य नव्हतं. बहिणींमधला हा संघर्ष बराच काळ सुरू होता. त्यानंतर स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले पण तेही तिन्ही बहिणींना बराच वेळ समजवू शकले नाहीत. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिन्ही बहिणींमध्ये लेखी करार करण्यात आला, ज्यामध्ये महिलेची उर्वरित मालमत्ता शशी व सुनीता यांच्या नावे करण्यात येईल, असं लिहिलं होतं. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले. या संपूर्ण घटनेला सुमारे 8 ते 9 तास लागले. तोपर्यंत मृतदेह स्मशानभूमीतच ठेवण्यात आला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश