शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तिसरी मुलगी झाल्याने आईने गळा दाबून केली हत्या, हत्येनंतर लावून घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 13:31 IST

तिसरी मुलगी झाल्याने चिडलेल्या महिलेने आपल्याच एक महिन्याच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

गुरुग्राम - तिसरी मुलगी झाल्याने चिडलेल्या महिलेने आपल्याच एक महिन्याच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर महिलेने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना राजेंद्र पार्क पोलीस स्टेशन अंतर्गत असणा-या चंदू गावातील आहे. मृत महिलेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे राजेंद्र पार्क पोलिसांनी महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वडिल जगदीश यादव यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. जगदीश यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या मुलीचं 27 फेब्रुवारी 2009 मध्ये मनमोहन उर्फ मोनू याच्यासोबत लग्न झालं होतं. मनमोहन याचं गावात भाजीपाल्याचं दुकान आहे. लग्नानंतर सलग तीन मुली जन्माला आल्या होत्या. एक महिन्यांपुर्वीच तिस-या मुलीचा जन्म झाला होता. 

तिसरी मुलगी झाल्यानंतर आपली मुलगी प्रचंड तणावात गेली होती अशी माहिती जगदीश यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी मुलीच्या सास-यांनी फोन करुन तिने मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचं मला कळवलं असं जगदीश यांचं म्हणणं आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृत महिलेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात येतील असं पोलिसांनी सांगितलं आहे.