शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सूत जुळलं! ५ मुलांच्या आईचं तरुणावर प्रेम जडलं; दोघांना रंगेहाथ पकडलं, जबरदस्तीने लग्न लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:07 IST

पाच मुलांची आई एका तरुणाच्या प्रेमात पडली. लोकांनी तिला त्याच्यासोबत रंगेहाथ पकडलं.

प्रेम आंधळं असतं, त्याला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. पाच मुलांची आई एका तरुणाच्या प्रेमात पडली. लोकांनी तिला त्याच्यासोबत रंगेहाथ पकडलं. गावकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मुफस्सिल पोलीस ठाण्यातील सुजा गांधी गावातील गावकऱ्यांनी पाच मुलांच्या आईला एका तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. सर्वात आधी तरुणाला मारहाण करण्यात आली आणि नंतर दोघांचंही जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. फोटोमध्ये महिला आणि तिच्या प्रियकरासह लोकांची गर्दी जमल्याचं पाहायला मिळत आहे.

गावातील पाच मुलांची आईचे गेल्या एक वर्षापासून गावात राहणारा डेटा ऑपरेटर विकास कुमारसोबत प्रेमसंबंध होते. तीन महिन्यांपूर्वीही दोघांनाही लोकांनी रंगेहाथ पकडलं होतं. पण नंतर पंचायत घेऊन प्रकरण मिटवण्यात आलं. दोघेही एकमेकांना भेटणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला होता. पण पुन्हा एकदा लोकांनी त्या दोघांना गावाबाहेर भेटताना पाहिलं. यानंतर लोक संतप्त झाले. दोघांनाही पकडून मारहाण करण्यात आली आणि हॉलमध्ये बंद करण्यात आलं. नंतर गावकऱ्यांनी दोघांचंही लग्न लावून दिलं.

महिलेने दिलेल्या माहितीननुसार, आता तिला तिच्या प्रियकरासोबत आणि मुलांसोबतच राहायचं आहे. तर विकासने सांगितलं की,तो साहेबपूर कमल ब्लॉक अंतर्गत डेटा ऑपरेटर आहे आणि त्याला एक मुलगा देखील आहे. त्याला त्याच्या दोन्ही पत्नीसोबत राहायचं आहे. गावकऱ्यांनी त्याला लग्न करण्यास भाग पाडलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ते याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार