शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मदर्स डे : 35 टक्के महिलांना नकोय दुसरे अपत्य

By admin | Published: May 14, 2017 8:38 AM

बदलत्या जीवनशैलीनुसार आपले विचारही बदलत आहेत. कुटुंब नियोजनाला आधी भारतात जास्त महत्व दिलं जात नव्हतं तर आज कुटुंब नियोजनाला अत्यंत महत्वाचं मानलं जातं.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बदलत्या जीवनशैलीनुसार आपले विचारही बदलत आहेत. कुटुंब नियोजनाला आधी भारतात जास्त महत्व दिलं जात नव्हतं तर आज कुटुंब नियोजनाला अत्यंत महत्वाचं मानलं जातं. "मदर्स डे"निमित्त असोचेमच्या सामाजिक विभागाने देशभरातील महत्वाच्या दहा शहरातून महिलांचे सर्वेक्षण केले. 
 
या सर्वेक्षणानुसार भारतातील शहरी भागात काम करणाऱ्या 35 टक्के काम करणाऱ्या महिलांना दुसरं मुल नकोय. कामासोबत इतर व्यापामुळे  दुसऱ्या मुलासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण त्यांच्याकडून देण्यात आलं आहे.  तर  काहींना एकाच मुलावर लक्ष केंद्रीत करता यावं म्हणून दुसरे अपत्य नको आहे.   
 
अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि मुंबईतील जवळपास 1500 महिलांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी लग्नसंबंधातील ताणतणाव, कामाच्या ठिकाणचा वाढता तणाव, मुलांच्या संगोपनासाठीचा खर्च ही एकाच अपत्यावर थांबण्यामागची मुख्य कारणे असल्याचं समोर आलं आहे. तर दुसऱ्या बाळंतपणासाठी घेतलेल्या रजेमुळे आपल्या पदोन्नतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नसल्याचे म्हटले. 
 
काहींना त्यांच्या जोडीदाराकडून दुसऱ्या मुलाबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 
हल्ली मोठ्या शहरांमध्ये छोटे कुटुंब असल्याने तसेच नोकरीनिमित्त घराबाहेर असलेली आई आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही, हे प्रमाण शहरांत खूप आहे.