शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

सरकार स्थापनेच्या हालचाली वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 2:10 AM

मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनाचा ४0 दिवसांचा दुखवटा काश्मीरमध्ये संपला आहे. मात्र तिथे पीडीपी-भाजप आघाडीचे सरकार स्थापन झालेले नाही.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनाचा ४0 दिवसांचा दुखवटा काश्मीरमध्ये संपला आहे. मात्र तिथे पीडीपी-भाजप आघाडीचे सरकार स्थापन झालेले नाही. आघाडीचे सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे सरचिटणीस राम माधव मेहबूबा मुफ्तींची भेट घेण्यासाठी पुढील श्रीनगरला जाणार असून, त्यानंतर सरकारस्थापनेचा तिढा हमखास सुटेल, अशी माहिती भाजप मुख्यालयातील सूत्रांकडून दिली.जम्मू काश्मीरमधे सरकार स्थापन करण्यापूर्वी दोन्ही पक्षांत विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आघाडीच्या अजेंड्याबाबत पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्तींनी केंद्र सरकारला काही अटी घातल्या आहेत. त्यावरील चर्चा सुरू असताना पीडीपीने पवित्रा अचानक बदलला आणि आणखी काही नव्या शर्ती राज्यातील भाजप नेत्यांना ऐकवण्यात आल्या. सत्तास्थापनेत त्यामुळे साहजिकच तिढा निर्माण झाला. मात्र केंद्र सरकार आणि केंद्रीय नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर हा तिढा सुटेल, अशी भाजपला आशा आहे. (विशेष प्रतिनिधी)भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची २ फेब्रुवारी रोजी भेट घेतली आणि सरकारस्थापनेच्या निर्णयासाठी १0 दिवसांचा वेळ मागितला. ती मुदत १२ फेब्रुवारी रोजी संपत आहे. तिढा सुटावा, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा व माजी उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांच्या नेतृत्वाखाली तेथील नेत्यांचे पथक मंगळवारी दिल्लीत धडकले. गृहमंत्री राजनाथसिंह, अरूण जेटली, नितीन गडकरी, उमा भारती या केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेण्यात हे नेते व्यस्त होते. आघाडीचे सरकार स्थापन करण्यातले फायदे तोटे त्यांनी केंद्रीय नेत्यांना ऐकवल्याचे समजले.