शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

खासदार निधीला पैसे नाहीत, मोदी सरकारनं प्रसिद्धीवर केले १,६९८ कोटी खर्च – खासदार श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 15:24 IST

देशातील आरोग्य व्यवस्था ही अमेरिकेच्याही पुढे गेली आहे असे सांगणाऱ्या एका खासदाराला खडेबोल सुनावत मोदी सरकारच्या आरोग्य व्यवस्थेच्या दाव्यांची खासदार श्रीकांत शिंदे यांनी पोलखोल केली.

नवी दिल्ली- देशातील आरोग्यव्यवस्था सध्याच्या घडीला अमेरिकेपेक्षाही अधिक चांगली झाली आहे, असे सांगत केंद्र शासनाच्या कारभाराचे कौतुक करणाऱ्या खासदाराला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी लोकसभेत जोरदार उत्तर दिले. देशात आरोग्य क्षेत्रात काम झाले असले तर कोट्यवधींची निधी खर्च करायची काय गरज आहे असा सवाल करत खासदार निधी देण्यासाठी पैसे नसताना मोदी सरकारने गेल्या तीन वर्षात प्रसिद्धीसाठी तब्बल १ हजार ६९८ कोटी रूपयांचा खर्च केल्याचा आरोप त्यांनी केला.

डॉ. शिंदे यांनी पुरवण्या मागण्यांवर बोलत असताना केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर चौफेर फटकेबाजी केली. तुम्हारी फाईलो मे गाव का मौसम गुलाबी है, मगर ये आकडे झूठे है, और तुम्हारे दावे किताबी है, अशा कवितेच्या ओळी म्हणत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टिकास्त्न सोडले. कोरोनाच्या संकटात देशातील डॉक्टरांनी सक्षमपणे काम केले. सरकारनेही काही चांगले कामे केली. त्यामुळे सर्वच गोष्टींवर टिका करणार नाही. मात्र एकीकडे देशातील खासदारांचा खासदार निधी बंद केला आहे. तर स्वत:च्या प्रसिद्धीसाठी गेल्या तीन वर्षात मोदी सरकारने तब्बल १ हजार ६९८ कोटी रूपयांचा खर्च केला आहे. म्हणजे केंद्र सरकार दरवर्षी सरासरी ६०० कोटींचा खर्च फक्त प्रसिद्धीसाठी करते आहे. त्यामुळे आज देशाचा पेट्रोल पंप असो वा हॉस्पिटल सर्वच ठिकाणी मोदीजी हात जोडून दिसतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

तसेच देशातील आरोग्य व्यवस्था ही अमेरिकेच्याही पुढे गेली आहे असे सांगणाऱ्या एका खासदाराला खडेबोल सुनावत मोदी सरकारच्या आरोग्य व्यवस्थेच्या दाव्यांची पोलखोल केली. २०१७ साली केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशात दीड लाख आरोग्य केंद्र उभे केले जातील अशी घोषणा केली होती. परंतु चार वर्षानंतरही अवघे ५५ टक्के म्हणजे ८० हजार आरोग्य केंद्र उभारले गेले आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात ७० हजार आरोग्य केंद्र कसे बनवणार याचेही उत्तर सरकारने द्यावं असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी मोदी सरकारला विचारला.

दरम्यान, यंदाच्या देशाच्या अर्थसंकल्पात देशाचे आरोग्य बजेट १३७ टक्क्यांनी वाढवून २.२३ लाख कोटींची तरतूद केल्याचा दावा सरकारने केला होता. मात्र प्रत्यक्षात जेव्हा आरोग्याविषयीची कागदपत्रे वाचली त्यावेळी खरी बाजू समोर आली. त्यानुसार आरोग्य मंत्रालयाच्या अर्थसंकल्पातील सुधारित अंदाजाच्या तुलनेत १० टक्के कपात करून ७८ हजार कोंटींवरून ७ हजार कोटींपर्यंत आल्याचे डॉ. शिंदे यांनी दाखवून दिले. भारतापेक्षा मागास देशांमध्ये आरोग्यावर जीडीपीच्या चार ते पाच टक्क्यांपर्यंत खर्च केला जातो. तर विकसित देश जीडीपीच्या ८ ते ९ टक्क्यांपर्यंत खर्च करतात. आपण अवघा १.८  टक्के जीडीपीच्या खर्च करतो. त्यामुळे ही तरतूद वाढवण्याची गरज डॉ.  श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

सीएसआर निधीची पळवापळवी रोखा

देशातील सार्वजनिक  उपक्र मातील कंपन्यांचा सीएसआर निधी मोठा आहे. त्याचा वापर करत खासदार निधीची कामे करण्यासाठी धोरण निश्चित करण्याची मागणी यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. हे सांगत असताना महाराष्ट्रातील सीएसआर निधीची पळवापळव कशी केली जाते हे त्यांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सुरू असलेल्या कंपन्या आपल्याच संपर्कातील उत्तर प्रदेशातील संस्थांना निधी देतात. त्यामुळे महाराष्ट्राचा निधी उत्तर प्रदेशात वापरला जातो. त्यामुळे याबाबत ज्या ठिकाणी कंपनी त्याच ठिकाणी निधी  खर्च करण्याबाबत धोरण ठरवण्याची मागणीही यावेळी डॉ. शिंदे यांनी लोकसभेत केली.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे