शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
3
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
4
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
5
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
7
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
8
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
9
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
10
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
11
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
12
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
13
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
14
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
15
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
16
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
17
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
18
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
19
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
20
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक

खासदार कंगनाचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान; भाजपने आक्षेप घेत सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 5:19 PM

काही दिवसापूर्वी खासदार कंगना रणौतने एका मुलाखतीदरम्यान शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

खासदार कंगना रणौत यांनी काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली होती. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. या टीकेनंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आणि कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वाढता वाद पाहता पक्षाने आता अधिकृत निवेदन जारी करून कंगना रणौत यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून, कंगनाला भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरसाठी भाजपाचा 'मास्टर प्लॅन'; PM नरेंद्र मोदींच्या किती सभा होणार?

एका मुलाखतीत खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, जर आमचे नेतृत्व मजबूत नसते तर शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबचे बांगलादेशात रूपांतर झाले असते. कंगना राणौतच्या या वक्तव्यावर विरोधकांनी हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसने कंगनावर एनएसए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपनेही कंगनाच्या वक्तव्यावर टीका केली. तिचे हे वैयक्तिक विधान असून पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

कंगना रणौतच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपच्या केंद्रीय माध्यम विभागाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, "भाजप खासदार कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. भारतीय जनता पक्ष कंगना राणौतच्या विधानावर असहमत आहे. पक्षाच्या वतीने धोरणावर बोलण्यासाठी कंगना रणौतला अशी विधाने करण्याची परवानगी नाही किंवा त्यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिले आहेत.

एका मुलाखतीत भाजप खासदार कंगना रणौत म्हणाल्या होत्या की, आमचे सर्वोच्च नेतृत्व कमकुवत असते तर बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात होऊ शकली असती. शेतकऱ्यांच्या आंदोलनात काय झाले ते सर्वांनी पाहिले. निदर्शनाच्या नावाखाली हिंसाचार पसरवण्यात आला. तिथे बलात्कार होत होते, लोकांना मारले जात होते, फासावर लटकवले जात होते. जेव्हा हे विधेयक मागे घेण्यात आले तेव्हा सर्वच भोंदूबाबांना धक्का बसला. कारण त्याचं नियोजन खूप लांबलचक होतं, असंही कंगना रणौत म्हणाली. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपा