शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 19:17 IST

CoronaVirus: एका केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे.

लखनऊ: संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये संसाधने मुबलक प्रमाणात असून, कोरोना नियंत्रणासाठी अनेकविध उपाययोजना केल्याचे योगी सरकार सांगत असले, तरी उत्तर प्रदेशातून केंद्रात मंत्री झालेल्या एका नेत्याने उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे. (mp santosh gangwar wrote letter to cm yogi adityanath over health system in uttar pradesh)

उत्तर प्रदेशमधील बरेली येथून खासदार असलेले केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आरोग्य व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. बरेली येथील आरोग्य अधिकारी साधा फोनही उचलत नाहीत, अशी खंत गंगवार यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. कोरोनाची स्थिती बिकट आहे. रेफर करण्यात आलेल्या रुग्णांनाही सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. त्यांना परत पाठवले जाते. यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावत आहे. रुग्णांना भरती करून उपचार करण्यात यावेत, असे गंगवार यांनी योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

“उपाययोजनेपेक्षा ठाकरे सरकारचं पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष”

बाजारमूल्यांपेक्षा अधिक किमतीने उपकरणे

कोरोना संकटाच्या काळात आवश्यक असलेली अनेक उपकरणे बाजार भावापेक्षा दीड पट अधिक किमतीने विकली जात आहेत. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच किमती निर्धारित केल्या पाहिजेत. याशिवाय कोरोना रुग्णालयात चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी गंगवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. 

दिलासा! २५ राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ८,९२३ कोटींचा निधी वितरीत

ऑक्सिजनची कमतरता

उत्तर प्रदेशातील बरेलीसह अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये शक्य तितक्या लवकर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा. आयुषमान भारताशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण तातडीने सुरू करण्यात यावे, अशा काही सूचनाही या पत्रात देण्यात आल्या आहेत. 

“राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOxygen Cylinderऑक्सिजनremdesivirरेमडेसिवीरUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण