शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Mukesh Ambani: 4G-5G पेक्षा आई-बाप कितीतरी पटीने मोठे; मुकेश अंबानींचा तरुणाईला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 9:51 PM

पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी हा सल्ला दिला आहे.

रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांनीच काही वर्षांपूर्वी देशभरात ४जी सेवा लाँच केली होती. आता ५जी सेवा देखील आणली आहे. करोडो लोक जिओद्वारे इंटरनेट डेटा वापरत आहेत. हे प्रमाण येत्या काळात आणखी वाढणार आहे. याच अंबानींनी तरुणवर्गाला या ४जी, ५जीवरून महत्वाचा सल्ला दिला आहे. 

देशातील तरुणाई ४जी, ५जी वरून खूप उत्साहित आहेत, परंतू त्यांना सांगू इच्छितो की माताजी, पिताजी पेक्षा कोणताही जी मोठा नाहीय. तरुणांनी त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या त्यागाला विसरता नये, असा सल्ला अंबानी यांनी दिला. याचबरोबर त्यांनी 2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल आणि जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल, असे भाकीत केले. स्वच्छ ऊर्जा क्रांती, जैव ऊर्जा क्रांती आणि डिजिटल क्रांती आगामी काळात भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी गेम चेंजर ठरतील, असेही ते म्हणाले. 

पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी हा सल्ला दिला आहे. आज तुमचा दिवस आहे. पण तुमच्या पालकांनी या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली आहे. त्यांच्या आयुष्यभराचे स्वप्न होते, त्यांचा संघर्ष आणि त्याग कधीही विसरू नका, असे अंबानी म्हणाले. भारताचा अमृत काळ सुरु असताना ही बॅच एका पदवीधर होत आहे. आपल्या परंपरेत अमृत काळ हा कोणत्याही नवीन कार्यासाठी शुभ मानला जातो. भारताची अभूतपूर्व आर्थिक वाढ होईल आणि संधींचा पूर येईल, असेही ते म्हणाले. 

स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि जैव-ऊर्जा क्रांतीमुळे शाश्वत ऊर्जा मिळेल तर डिजिटल क्रांतीमुळे आपल्याला ऊर्जेचा वापर योग्यरीतीने करण्यास मदत होईल. AI, रोबोटिक्स आणि IoT सारखे तंत्रज्ञान आमूलाग्र बदल घडवून आणतील. त्यांचा उपयोग आपण आपल्या फायद्यासाठी केला पाहिजे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी