शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Mulayam Singh Yadav Death: पूर्वी शहीदांची टोपी घरी यायची, मुलायम सिहांनी पार्थिव पोहोचविण्याचा निर्णय घेतला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 11:44 IST

मुलायम सिंहांनी संरक्षण मंत्रीपद हाती घेताच आधी सैनिकांसाठीचा हा कायदा बदलला. एखाद्या गावातला सैनिक शहीद झाला तर त्याच्या घरी केवळ सैन्याचे अधिकारी नाहीत, तर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना देखील जाण्याचा नियम केला.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांनी आज अखेरचा श्वास घेतला. शिक्षक असलेले मुलायम युपीच्या राजकारणाचे सर कधी झाले कोणालाच कळले नाही. 1967 मध्ये ते सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर सर्वात कमी वयात आमदार झाले आणि राजकारणात आले. 

दहा वेळा आमदार, सात वेळा खासदारकी भूषविणारे मुलायम किती कमी वयात राजकारणात आले असतील याचा विचार करा. हेच मुलायम १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ या काळात देशाचे संरक्षण मंत्री देखील होते. राजकीय अस्थिरतेचा काळ होता, याचवेळी मुलायम यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप महत्वाचा निर्णय घेतला. तुम्ही जुन्या सिनेमांमध्ये पाहिले असेल, सैनिक जेव्हा देशाच्या सीमेवर शहीद व्हायचा तेव्हा तो संदेश घेऊन सैन्याचा अधिकारी शहीदाच्या घरी दारात जायचा. त्या शहीदाच्या कुटुंबाला सैनिकाची टोपी, सैन्याचा ड्रेस दिला जायचा. आज शहीद सैनिकांचे पार्थिव त्यांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. हा निर्णय मुलायम सिहांनी घेतला होता. 

मुलायम सिंहांनी संरक्षण मंत्रीपद हाती घेताच आधी सैनिकांसाठीचा हा कायदा बदलला. एखाद्या गावातला सैनिक शहीद झाला तर त्याच्या घरी केवळ सैन्याचे अधिकारी नाहीत, तर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना देखील जाण्याचा नियम केला. यामुळे आज आपल्या जवानांना सन्मानाने अलविदा केले जाते. याच मुलायम सिहांनी सुखोई ३० लढाऊ विमानांची डील केली होती. मुलायमसिंग यादव 1989 ते 1991, 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 असे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1996 ते 1998 या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री होते. मुलायम सिंहांना गृह मंत्री पद हवे होते. परंतू, त्यांना संरक्षण मंत्री पद देण्यात आले. त्याचेही त्यांनी सोने केले.  

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवIndian Armyभारतीय जवान