शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Mulayam Singh Yadav Death: देवेगौडा नाही, मुलायम सिंहच पंतप्रधान होणार होते, तयारीही झालेली, पण... दोनदा संधी हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:03 IST

सरकार स्थापन करण्यासाठी तेव्हाचे मोठे नेते किशन सिंह सुरजित यांना जबाबदारी देण्यात आली. त्यांनी मुलायम सिंहांच्या नावाचा आग्रह धरला.

मुलायम सिंह यादव यांना राजकारणाच्या आखाड्यातील पैलवान म्हटले जायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आज आपल्या भाषणाची सात मिनिटे मुलायम सिहांची स्तुती केली. युपीचे तीन वेळा मुख्यमंत्री ते केंद्रात संरक्षण मंत्री झालेल्या या मुलायम सिंहांची पंतप्रधान न होण्याची गोष्ट देखील खूप महत्वाची आहे. 

मुलायम सिंह यादव एकदा नाही दोनदा पंतप्रधान होता होता राहिले होते. मुलायम सिंहांनी भर सभेत त्यांच्या पंतप्रधान न होण्यामागच्या ' चार शुक्राचार्यांची' नावे घेतली होती. देवेगौडा पंतप्रधान झाले, परंतू त्यांच्या जागी मुलायम सिंहांचे नाव चर्चेत होते. १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. काँग्रेसच्या १४१ जागा आणि भाजपाच्या १६१ जागा आल्या होता. तेव्हा अटल बिहारी वायपेयी यांना सरकार बनविण्याचे निमंत्रण मिळाले. वाजपेयींचे सरकार १३ दिवसांतच पडले. 

आता काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी होती. मात्र, त्यांना सर्व पक्षांना एकत्र घेऊन खिचडी सरकार बनवायचे नव्हते. व्ही पी सिंह यांनी देखील पंतप्रधान बनण्यास नकार दिला. मात्र, याचवेळी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पीएम बनविण्यासाठी नाव पुढे केले. या नावावर पोलिट ब्युरोने फुली मारली. आता उरले लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव. त्यात लालू यांचे नाव चारा घोटाळ्यात बदनाम होऊ लागले होते. यामुळे लालू रेसमधून बाहेर पडले. सरकार स्थापन करण्यासाठी तेव्हाचे मोठे नेते किशन सिंह सुरजित यांना जबाबदारी देण्यात आली. त्यांनी मुलायम सिंहांच्या नावाचा आग्रह धरला. मुलायम सिंह पीएम होणार हे पक्के झाले, शपथ समारंभाची तशी तयारीही करण्यात आली. पण लालू यादव आणि शरद यादव यांनी त्यास विरोध दर्शविला. यामुळे नंतर एचडी देवेगौडांचा नंबर लागला.

देवेगौडांचे सरकारही काही महिन्यांनी पडले. १९९९ मध्ये पुन्हा निवडणुका लागल्या. मुलायम सिंह संभल आणि कन्नौजच्या जागांवर जिंकले होते. पंतप्रधान पदासाठी पुन्हा त्यांचे नाव आले. तेव्हाही यादव नेत्यांनी यास विरोध केला. तेव्हाही लालू प्रसाद पुढे होते. ही दुसरी संधी निघून गेली. मुलायम यांनी एका सभेत लालू प्रसाद यादव, शरद यादव, चंद्रा बाबू नायडू आणि व्ही पी सिंहांचे नाव घेत यांच्यामुळेच मी पंतप्रधान बनलो नाही, असे सांगितले होते. 

मुलायमसिंग यादव 1989 ते 1991, 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 असे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1996 ते 1998 या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री होते. मुलायम सिंहांना गृह मंत्री पद हवे होते. परंतू, त्यांना संरक्षण मंत्री पद देण्यात आले. त्याचेही त्यांनी सोने केले. 

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवprime ministerपंतप्रधान