शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

दलितांना शस्त्रे नाकारल्याने मुस्लिम आक्रमण यशस्वी

By admin | Published: April 14, 2016 12:58 AM

मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या

नवी दिल्ली : मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या विचारांशी जवळीक दाखविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याचे ‘आॅर्गनायझर’ या मुखपत्रातील ताज्या लेखावरून स्पष्ट होते.भारतीय समाजातील बहुतांश घटकांना शस्त्रे बाळगता येत नव्हती. दलितांना नि:शस्त्र ठेवले जात होते. त्यांना रणांगणात लढण्याची परवानगी दिली जात नव्हती, त्यामुळेच त्या काळी विदेशींनी किंवा मुुस्लिमांनी भारतावर केलेली आक्रमणे यशस्वी झाली, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत योग्य असल्याचा दावा साप्ताहिक ‘आॅर्गनायझर’ने नुकत्याच प्रकाशित अंकात केला आहे. अस्पृश्यांना शस्त्रांपासून वंचित ठेवण्यात आले नसते तर या देशावर विदेशी लोकांनी राज्य केले नसते, असे आंबेडकरांचे विधान या लेखात नमूद केले आहे. संपूर्ण देशभरात डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.मुखपृष्ठात सामाजिक योगदानाची दखल...आॅर्गनायझरच्या मुखपृष्ठ लेखात (कव्हर स्टोरी) डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक योगदानाची विस्तृत माहिती दिलेली आहे. ते वंचित आणि कमकुवत घटकांसाठी कसे लढले, याचा तपशीलही त्यात आहे. भारताची लोकशाही आणि राष्ट्रवादाला सामाजिक-आर्थिक आधारावर नवे परिमाण मिळवून देण्यात आंबेडकरांचे योगदान एकमेवाद्वितीय होते. समाजातील तळागाळाच्या घटकांना आत्मसन्मान मिळाल्याखेरीज देश उभा ठाकणार नाही, हे डॉ. आंबेडकरांचे विचार होते, असेही त्यात म्हटले आहे. दलितप्रेमाचे कारण काय?हिंदूंना एकजूट करण्याच्या व्यापक योजनेंतर्गत दलितांना आपल्याकडे ओढत त्यांचे ख्रिश्चनांमध्ये होणारे धर्मांतर टाळण्यासह मुस्लिम संघटनांनी अनुसूचित जातींसोबत आघाडी स्थापन करू नये या हेतूने संघाने दलितांकडे लक्ष केंद्रित केले असावे, असे विश्लेषकांना वाटते.