शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी
2
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
3
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
4
Womens T20 World Cup :२ वर्ल्ड चॅम्पियन्स तर पाटी कोरी असणाऱ्या २ संघांनी गाठली सेमी
5
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
6
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
7
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
8
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडिज महिला उपांत्य फेरीत
9
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
10
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
11
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
12
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
13
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
14
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
15
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
16
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
17
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
18
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
19
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
20
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल

मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 2:03 PM

'कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी.'

नवी दिल्ली: देशात भाजपचे सरकार आल्यापासून विरोधकांकडून अनेकदा मुस्लिम/अल्पसंख्यांक धोक्यात आहे किंवा त्यांना भीती वाटते, असे म्हटले जाते. मोदी सरकारची धोरणे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधक करतात, त्यामुळे मुस्लिमांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावर इंडिया टुडेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

स्मृती इराणींचा विरोधकांना टोला

मुस्लिम समाजात किंवा अल्पसंख्याक समाजात भीती निर्माण केली जात आहे, या प्रश्नावर स्मृती इराणी यांनी आपल्याच देशात कोणीही अल्पसंख्याक कसा असू शकतो, असा टोला लगावला. कायदा सर्वांसाठी समान आहे. संविधान आणि कायद्यानेच देश चालतो. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी. त्यांच्या कपड्यांवरुन किंवा इतर गोष्टीवरुन कोणाचाही जज करू नका. प्रत्येकाने भारतीय म्हणून पाहिले पाहिजे.

मी स्वत: एका अशा व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्याच्या समुदायाची लोकसंख्या संपूर्ण जगात फक्त 55 हजार आहे. माझे पारशी कुटुंबीय म्हणतात की, आपण आपल्याच देशात अल्पसंख्याक कसे असू शकतो. हे एकून मला खूप आनंद होतो. म्हणूनच सर्व भारतीय आहोत, या भावनेने आपण पुढे गेले पाहिजे, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

यावेळी मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा सर्व समाजांना मोठा फायदा झाला आहे, यावरही केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. मग ते आयुष्मान भारत बद्दल असो किंवा मोफत रेशन देण्याचा विषय असो किंवा घरांमध्ये शौचालये देण्याचा विषय असो. या योजनांचा लाभ प्रत्येक समाजाला मिळाला आहे, असंही इराणी यावेळी म्हणाल्या.

राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोलयावेली त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही टोमणा मारला. लंडनमध्ये दिलेल्या त्यांच्या वक्तव्यावर म्हणाल्या, आपल्या देशात प्रत्येक आई आपल्या मुलांना म्हणथे की, घरात भांडण करा, बाहेर नका करू. राहुल गांधींनी काय केले? एक भारतीय म्हणून मी त्या गोष्टीला अजिबात स्वीकारू शकत नाही. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, अशावेळी बाहेर जाऊन अशी विधाने केली जातात. सभागृहात गैरहजर राहणाऱ्या खासदारांबद्दल काय बोलायचं... असा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाMuslimमुस्लीमcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी