शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मुस्लिमांनी अयोध्येचा दावा सोडावा अन्यथा भारत सीरिया बनेल - श्री श्री रवि शंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 13:01 IST

राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

ठळक मुद्देराम मंदिर वादावर लवकर तोडगा निघाला नाही तर भारताचा सीरिया बनेल असे विधान त्यांनी इंडिया टुडेशी बोलताना केले. इस्लाम वादग्रस्त जागेमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी देत नाही.

नवी दिल्ली - राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. राम मंदिर मुद्यावर लवकर तोडगा निघाला नाही तर भारत सीरिया बनेल असे रविशंकर यांनी म्हटले आहे. राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व पक्षकारांशी रवि शंकर प्रसाद मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा करत आहेत. 

राम मंदिर वादावर लवकर तोडगा निघाला नाही तर भारताचा सीरिया बनेल असे विधान त्यांनी इंडिया टुडेशी बोलताना केले. सीरियामधील गृहयुद्ध लक्षात घेऊन मुस्लिमांनी अयोध्येवरील दावा सोडून द्यावा. सदिच्छा, मित्रभावनेच्या हेतूने मी मुस्लिमांना अयोध्येवरील दावा सोडण्याचे आवाहन करतो. अयोध्या हे मुस्लिमांच्या विश्वासाचे स्थान नाही असे रवि शंकर यांनी सांगितले. 

इस्लाम वादग्रस्त जागेमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी देत नाही. भगवान प्रभू रामचंद्रांचा दुसऱ्या जागेवर जन्म होऊ शकत नाही असे 61 वर्षीय अध्यात्मिक गुरु रवि शंकर यांनी म्हटले आहे. रविशंकर यांनी ज्या सीरियाचा दाखला दिला तिथे  राष्ट्राध्यक्ष बाशर अल असाद यांचे सरकार आणि त्यांच्या विरोधी गटांमध्ये रक्तरंजित लढाई सुरु आहे.  अयोध्य प्रकरणावरुन तशीच स्थिती भारतात उदभवेल असे रवि शंकर यांना वाटते. सीरियामध्ये सुरु असलेल्या या गृहयुद्धाचे हे आठवेवर्ष असून आतापर्यंत 4 लाख 65 हजार सीरियन नागरिकांचा या लढाईत मृत्यू झाला आहे. दहालाखापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.                                    

टॅग्स :Ayodhyaअयोध्या