शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
2
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
4
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
5
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
6
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
7
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
8
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
9
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
10
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
11
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
12
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
13
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
14
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
15
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
16
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
17
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
18
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
19
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
20
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

नवऱ्याने दिलेल्या मोबाईलवरुन बॉयफ्रेंडला करायची Video कॉल, व्हॅलेटाईन वीकमध्ये झाली पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:58 IST

लग्नाच्या दहा महिन्यांनंतर व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दहा महिन्यांनंतर व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. यासोबतच तिने दागिने आणि रोख रक्कमही पळवून नेली. महिलेचा पती दुसऱ्या शहरात काम करतो. ती महिला तिच्या प्रियकराशी व्हिडीओ कॉलवर सतत संपर्कात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण साहेबगंज पोलीस स्टेशन परिसरातील रामपूर असली गावातील आहे. येथे राहणाऱ्या तरुणाचं लग्न २४ एप्रिल २०२४ रोजी झालं. लग्नानंतर काही महिन्यांतच पत्नीच्या सांगण्यावरून तो तरुण पैसे कमवण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला. याच दरम्यान त्याच्या पत्नीने एक अँड्रॉइड मोबाईल खरेदी केला. मोबाईल खरेदी केल्यानंतर, महिलेने तिच्या पतीपेक्षा तिच्या प्रियकरासोबत जास्त बोलायला सुरुवात केली.

१० फेब्रुवारीच्या रात्री महिलेने प्रथम तिच्या सासू आणि सासऱ्यांना जेवण दिलं आणि त्यांना झोपवलं. यानंतर तिने घरात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम गोळा केली आणि तिच्या प्रियकरासोबत बाईकवरून पळून गेली. रात्री सासू आणि सासऱ्यांना बाईकचा आवाज ऐकू आला, पण त्यांना काहीच समजलं नाही. सकाळी सून घरात सापडली नाही तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला फोन करून माहिती दिली. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

महिलेच्या सासऱ्यांनी साहिबगंज पोलीस ठाण्यात अर्ज सादर करून आपल्या सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, तो त्याच्या सुनेला या आशेने घरी घेऊन आला होता की ती कुटुंबाची सेवा करेल, परंतु लग्नाच्या काही महिन्यांनंतरच तिने तिच्या प्रियकरासोबत जाऊन कुटुंबाला धक्का दिला आहे. 

महिलेच्या पतीने सांगितलं की, त्याच्या पत्नीचं लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध सुरू होते. जेव्हा मला हे कळलं तेव्हा माझं माझ्या पत्नीशी भांडण झालं. मी माझ्या पगारातून तिला फोन विकत घेतला. मी बंगळुरूमध्ये राहतो आणि मजूर म्हणून काम करतो. पगार तिच्या खात्यात पाठवत असे, पण १० फेब्रुवारी रोजी ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तिने माझा विश्वास तोडला आणि ती निघून गेली. आता जर ती परत आली तर मी तिला माझ्यासोबत ठेवणार नाही. मी खूप मेहनत करून तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही ती पळून गेली.  खात्यात ३२ हजार रुपये जमा होते आणि तिने सोने-चांदीचे दागिनेही नेले आहेत. 

टॅग्स :Biharबिहार