शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

माझा लढा गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध

By admin | Published: March 27, 2016 12:08 AM

आसामच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देतानाच आपला लढा मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्याशी नसून, काँग्रेसशासित राज्यातील गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र

तिनसुकिया : आसामच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देतानाच आपला लढा मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्याशी नसून, काँग्रेसशासित राज्यातील गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. मोदी यांनी आसाममध्ये दोन जाहीर सभा घेतल्या. त्यापैकी तिनसुकियातील सभेत मोदी म्हणाले, माझे तीन अजेंडा आहेत. विकास, जलद विकास आणि सर्वांगीण विकास. आमच्या सरकारने राज्यात पायाभूत संरचनेच्या विकासासाठी यापूर्वीच्या सरकारच्या तुलनेत कितीतरी पट जास्त निधी दिला आहे. ७० वर्षीय गोगई यांनी राज्यातील निवडणुका म्हणजे मोदी आणि आपल्यातील थेट मुकाबला असल्याचे म्हटले होते. त्यांची फिरकी घेताना मी फक्त या वयोवृद्ध नेत्याप्रती आदर व्यक्त करू शकतो, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली. ते म्हणाले, नव्वदीला आलेले काँग्रेसचे नेते त्यांची लढाई मोदींसोबत असल्याचे सांगत आहेत. आदरणीय मुख्यमंत्रीजी आपण वरिष्ठ आणि मी लहान आहे. मी तुमच्याबद्दल आदर व्यक्त करू शकतो. कारण आमच्या संस्कृतीत लहान कधीच मोठ्यांसोबत लढत नाहीत आणि ज्येष्ठ लहानांना आशीर्वाद देतात.राज्यातील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांची मोदींनी प्रशंसा केली. घुसखोरीसारख्या किचकट मुद्याचा उल्लेख करायचे त्यांनी टाळले. विशेष म्हणजे भाजपाप्रणीत रालोआचा हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा आहे. विकासाचे महत्त्व आणि आसामची पाहिजे तशी प्रगती न होणे याकडेच पंतप्रधानांनी प्रामुख्याने लक्ष वेधले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच समृद्ध राज्यांमध्ये आसामची गणना होत होती. परंतु आता मात्र त्याचा पाच अल्प विकसित राज्यांमध्ये समावेश झाला असून याला काँग्रेसचे सरकार जबाबदार आहे,असा आरोप त्यांनी केला. (वृत्तसंस्था)