शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 19:20 IST

धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बिहारबद्दलचे त्यांचे नितांत प्रेम व्यक्त केले. आपल्या आत्म्यात बिहार वसतो आणि आपला पुढचा जन्म बिहारमध्येच व्हावा अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी बिहारचे वर्णन 'मोक्ष आणि ज्ञानाची भूमी' असे केले. धार्मिक विधीसाठी ते सध्या २०० अनुयांसह बिहारमधील गया येथे आहेत. बिहार हे एक अद्भुत राज्य असून, बिहारची खूप आवड आहे. माझा पुढचा जन्म बिहारमध्येच व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझा आत्मा बिहार असून, बिहार ही मोक्षभूमी आणि ज्ञानभूमी आहे, असे धीरेंद्र शास्त्री यांनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी दुसरे बागेश्वर म्हणून बिहारचा उल्लेख केला. बिहारचे माझ्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी मी वारंवार इथे येत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, काहीजण आमच्यावर कसलेही आरोप करतात. त्यांना मी सांगू इच्छितो की, मी काल होतो तसाच आज आहे आणि उद्या देखील असेन. काहीही टिप्पणी करणाऱ्यांनी प्रभू रामालाही सोडले नाही. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार बोलत असतो. ज्याचे काम होईल तो सत्कार करेल आणि ज्याचे काम होणार नाही ती मंडळी ढोंगी असे संबोधेल. 

टीकाकारांना प्रत्युत्तर तसेच आम्ही केवळ एका धार्मिक विधीसाठी गया येथे आलो आहोत. यामध्ये २०० अनुयायी सहभागी झाले आहेत. आम्ही इथे पिंडदान कार्यक्रमासाठी आलो आहोत. बागेश्वर धामशी संबंधित आलेल्यांना राहण्याची पावती मिळाली आहे. त्या पावतीच्या आधारे ते लोक येथे राहत आहेत. ते बागेश्वर धाम येथील कुटुंबीय आहेत. त्यामुळे त्यांना भेटणे ही माझी प्रमुख जबाबदारी आहे. पैसे घेऊन दरबार भरवला असे म्हणणारे लोक समजूतदार नाहीत असे मला वाटते, अशा शब्दांत धीरेंद्र शास्त्रींनी टीकाकारांचा समाचार घेतला. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामBiharबिहार