शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं उलगडलं गूढ

By admin | Published: May 31, 2017 4:28 PM

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा" असा नारा देत भारतीय स्वतंत्र लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ अखेर उलघडले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा" असा नारा देत भारतीय स्वतंत्र लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ अखेर उलघडले आहे. 1945 रोजी झालेल्या तैवानमधील विमान अपघातात जखमी झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमच भारतीय सरकारने स्पष्ट केले आहे. सायक सेन या व्यक्तीने याबाबत एक आरटीआय अंतर्गत याबाबतची माहिती मागितली होती. आरटीआयमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गृह मंत्रालयाकडून असे स्पष्ट करण्यात आले की, शहनवाज कमेटी, जस्टिस जीडी खोसला कमिशन आणि जस्टिस मुखर्जी कमिशन यांच्या रिपोर्टनुसार नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला होता. मुखर्जी कमिशन यांच्या रिपोर्टमध्ये पान क्रमांक 112 ते 122 याबाबत माहिती आहे. तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 37 गोपनीय फायली सरकारने याआधीच सार्वजनिक केल्या आहेत. 

गृह मंत्रालयाच्या या स्पष्टीकरणावर सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेताजीचे पंतू आणि पश्चिम बंगालचे भाजपा नेते चंद्र कुमार बोस यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गृह मंत्रालयाने याबाबत माफी मागावी असे म्हटले आहे. विमान अपघातात जखमी झाल्याने नेताजींचा मृत्यू झाल्याचे ब्रिटनमधील बोसफाईल्स डॉट इन्फो या संकेतस्थळावर 17 जानेवारी 2016 रोजी स्पष्ट केले होते. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई येथे झाला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बरोबर त्यावेळी असलेल्या पाच जणांची साक्ष उपलब्ध असून त्यात नेताजींचा निकटचा सहकारी. जपानचे दोन डॉक्टर, एक दुभाष्या व तैवानी परिचारिका यांचा समावेश आहे.