शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

नाव पाकिस्तान आहे, मात्र काम नापाक - राजनाथ सिंह

By admin | Published: July 18, 2016 6:15 PM

पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (सोमवारी) सुरुवात झाली. कोणतेही विधेयक सादर होण्यापूर्वी काश्मीर हिंसाचारावर चर्चा सुरु झाली. या चर्चेदरम्यान पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे. त्यांना आमच्या अंतर्गत मामल्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. जम्मू कश्मीच्या मुख्यमंत्री महबूबा यांनी स्थिती सामान्या होण्यापर्यंत थांबण्याचा सल्ला दिला आहे, तेथिल स्थिती सामान्या झाल्यास आम्ही कश्मीरच्या नागरिकासोबत चर्चा करणार आहे. काश्मीर मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेऊन राष्ट्रहिताचा विचार सर्वच पक्षांतून व्यक्त केला गेल्याबद्दल मोदींनी विरोधी पक्षांचे आभार मानले. 
 
राजनाथ सिंह पुढे बोलताना म्हणाले, परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीर मुद्द्यावर बैठक घेतली होती.  कश्मीरमध्ये हिंसाचाराच्या ५६६ घटना घडल्या त्यामध्ये १९४८ नागरिक जखमी झाले आहेत. तर हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा ८ जुलै रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३६ वर गेलेली आहे.
 
दरम्यान कश्मीर मुद्द्यावर काँग्रेसने राज्यसभेत पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, काश्मीरची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशी स्थिती तर १९९० मध्ये देखील नव्हती. दहशतवादाविरोधात आम्ही सरकारसोबत आहोत, मात्र काश्मीरमध्ये सामान्यांना लक्ष्य केले जात आहे.
काश्मीर जळतंय, मात्र ही आग दोन वर्षांची नसून गेल्या ६० वर्षांची आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.