शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभेच्या 'या' ४२९ जागा जिंकायच्या कशा?; मोदी-शहांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 15:49 IST

'मिशन २०१९'साठी कंबर कसलेल्या मोदी-शहांना, १३ राज्यांमधील ४२९ लोकसभा मतदारसंघांमध्ये 'कमळ' कसं फुलवायचं याची चिंता सतावू लागलीय.

नवी दिल्लीः देशातील २० राज्यांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवण्याचा पराक्रम करणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्षअमित शहा ही जोडी कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर चक्रव्यूहात अडकल्याचं चित्र आहे. 'मिशन २०१९'साठी कंबर कसलेल्या मोदी-शहांना, १३ राज्यांमधील ४२९ लोकसभा मतदारसंघांमध्ये 'कमळ' कसं फुलवायचं याची चिंता सतावू लागलीय. त्याचं कारण आहे, विरोधी पक्षांनी केलेली हातमिळवणी आणि त्यांच्यात वाढू लागलेली एकी.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, पण सत्तासुंदरीनं त्यांना हूल दिली. अक्षरशः त्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावला गेला. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणाऱ्या काँग्रेस-जेडीएसनं गट्टी केली. त्यांना मायावतींनीही 'टाळी' दिली आणि बीएस येडियुरप्पांना अडीच दिवसांत मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. बहुमत चाचणीआधीच त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपा पार नाकावर आपटली. त्यानंतर, 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या न्यायाने देशभरातील विरोधक एकत्र आलेत. कुमारस्वामींच्या शपथविधीला देशभरातील भाजपाविरोधी पक्षांचे नेते हजर राहणार आहेत. २०१९च्या लोकसभा महासंग्रामात मोदी-शहांचा विजयरथ रोखण्याचा विडाच त्यांनी उचललाय. 

उत्तर प्रदेशः (एकूण जागा - ८०)२०१४ मध्ये उत्तर प्रदेशनं मोदी-शहांना भक्कम साथ दिली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतही जनतेनं भाजपाला कौल दिला होता. परंतु, अलीकडेच झालेल्या फुलपूर आणि गोरखपूर पोटनिवडणुकीत अखिलेश-माया एकत्र आले आणि 'कमळ' कोमेजलं. त्यामुळे २०१९ मध्ये काँग्रेस-सपा-बसपाची आघाडी झाल्यास, गेल्या निवडणुकीत ८० पैकी ७३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला मोठा फटका बसू शकतो. 

बिहारः (एकूण जागा - ४०)नितीश कुमार रालोआत आल्यानं, २०१९ मध्ये बिहारमधील आकडा आणखी वाढवण्यासाठी मोदी-शहा मोर्चेबांधणी करत होते. परंतु, आता काँग्रेस-राजदची एकी त्यांना टक्कर देऊ शकते. मोदींच्या पराभवासाठी काँग्रेस नेते लालूंना टाळी द्यायला मागे-पुढे पाहतील असं वाटत नाही. 

पश्चिम बंगालः (एकूण जागा - ४२)तृणमूल काँग्रेसचा, ममता बॅनर्जी यांचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारण्याचा भाजपाची रणनीतीही फ्लॉप ठरू शकते. काँग्रेस-तृणमूल एकत्र येतीलच, पण डावेही त्यांना साथ देऊ शकतात. तसं झाल्यास मोदी-शहांच्या अडचणी फारच वाढतील. 

कर्नाटकः (एकूण जागा - २८)कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फायदा व्हावा या हेतूने येडियुरप्पांनी राजीनामा देताना भावनिक साद घातली आहे. परंतु, काँग्रेस-जेडीएस २०१९ मध्येही एकत्र मैदानात उतरले तर सगळीच समीकरणं बदलतील आणि भाजपाची कोंडी होईल. महाराष्ट्रः (एकूण जागा - ४८)लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचे संकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने दिले आहेत. त्यासोबतच, भाजपावर कुरघोडी करण्यासाठी झटणारी शिवसेनाही स्वबळावर लढली, तर भाजपाला 'जोर का झटका' लागू शकतो.   

त्याशिवाय, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या साथीने पाय रोवण्याचे भाजपाचे मनसुबे उधळण्यासाठी काँग्रेस-द्रमुक युती करू शकतात. ओडिशामध्येही बीजू जनता दल आणि काँग्रेस यांच्यात तह होऊ शकतो. दुसरीकडे, रालोआची साथ सोडणारा तेलुगू देसम पक्षही काँग्रेसच्या मदतीला जाऊ शकतो. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाने आधीच हातमिळवणी केली आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र येण्याची चिन्हं आहेत. 

हे सगळं गणित बघता, लोकसभेच्या ४२९ जागांसाठी रणनीती आखताना मोदी-शहा आणि त्यांच्या टीमची चांगलीच दमछाक होणार आहे. अर्थात, विरोधकांची आत्ता झालेली एकी किती टिकते, यावरच पुढचं सगळं राजकारण अवलंबून आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८