शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:38 IST

Narendra Modi Cabinet: रविवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील सहकारी मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले आहे. मात्र या खातेवाटपामध्ये भाजपाने संरक्षण, गृह, वित्त आणि परराष्ट्र ही चार प्रमुख मंत्रालये आपल्या ताब्यात ठेवली आहेत.

रविवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील सहकारी मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले आहे. मात्र या खातेवाटपामध्ये भाजपाने संरक्षण, गृह, वित्त आणि परराष्ट्र ही चार प्रमुख मंत्रालये आपल्या ताब्यात ठेवली आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी या चारही मंत्रालयांचा कार्यभार हा दुसऱ्या कार्यकाळात ही खाती सांभाळत असलेल्या मंत्र्यांकडेच कायम ठेवला आहे. त्यामध्ये राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण, अमित शाहा यांच्याकडे गृह, निर्मला सीतारमन यांच्याकडे वित्त आणि एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार कायम ठेवला आहे. आता या चार प्रमुख मंत्रालयांचा कार्यभार त्याच नेत्यांकडे कायम ठेवण्यामागची कारणं आहेत. तसेच त्याचा सरकारलाही विशेष फायदा होणार आहे. 

केंद्र सरकारमध्ये एकूण ८ प्रमुख कॅबिनेट समित्या असतात. त्यामधे संरक्षण समिती ही सर्वात महत्त्वाची असते. त्यामध्ये गृह, संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश असतो. आया या चारही मंत्रालयांमध्ये कुठलाही बदल न करता नरेंद्र मोदी यांनी सरकारची आधीचीच धोरणं पुढे नेली जातील, असा स्पष्ट संदेश दिला आहे. सध्या आघाडी सरकार असले तरी सरकारच्या धोरणांमध्ये फारसा बदल केला जाणार नाही. तसेच पहिल्या दोन कार्यकाळांप्रमाणेच झटपट निर्णय घेतले जातील, असे संकेत मोदींनी आपल्या चार विश्वासू सहकाऱ्यांकडे ही चार प्रमुख मंत्रालयं सोपवून दिला आहे. सीसीएस म्हणजेच कॅबिनेट संरक्षण समितीमधील चारही नेते हे भाजपाचे असल्याने राष्ट्रीय सुरक्षएबाबत एक धोरण ठरवण्यात आणि आणीबाणीच्या स्थितीत तातडीने निर्णय घेणं सोपं होणार आहे.  

दरम्यान, भाजपाचा बहुतांश मतदार हा राष्ट्रीय सुरक्षेबाबत कमालीचा संवेदनशील आहे. त्यामुळे या मंत्रालयांना आपल्या ताब्यात ठेवत भाजपाकडून एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार