शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Narendra Modi: पंजाबच्या विजयाबद्दल 'आप'लं अभिनंदन, PM मोदींनी दिलं महत्त्वाचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 23:26 IST

मोदींनी पंजाबच्या विजयाबद्दल आम आदमी पक्षाचेही अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी ट्विट करुन आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले.

नवी दिल्ली - देशाच्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपने पंजाब वगळता इतर सर्वच राज्यांमध्ये कमळ फुलविण्यात यश मिळवलं असून भाजपच्या विजयाचा देशभरात जल्लोष होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर कार्यालयापासून लखनौपर्यंत भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. युपीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयी सभेला संबोधित करताना जनतेचे आभार मानले. तसेच, विरोधकांवर जोरदार प्रहारही केला.

मोदींनी पंजाबच्या विजयाबद्दल आम आदमी पक्षाचेही अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी ट्विट करुन आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. तसेच, केंद्र सरकार म्हणून पंजाब राज्यासाठी शक्य ते पाठबळ देण्याचं काम मी करेन, असे आश्वासनही मोदींनी आम आदमी पक्षाला दिले आहे.

मी पंजाबमधील भाजप कार्यकर्त्याचं विशेष रुपाने कौतुक करतो. कारण, कठिण परिस्थितीतही त्यांनी ज्याप्रकारे पक्षाचा झेंडा बुलंद केला. त्यानुसार, पुढील काळात पंजाबमध्ये भाजप ताकदीनिशी विकसीत करण्यात येईल. पंजाब एक शक्तीच्या रुपाने पुढे येत असल्याचं मी आपल्या डोळ्यांनी पाहतोय. सीमावर्ती राज्य असल्याने पंजाबला, फुटीरतावादी राजकारणापासून सतर्क ठेवण्यसाठी भाजप कार्यकर्ता जीवाची पर्वा न करता हे काम करत राहिल, असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटले. 

दरम्यान, नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर नाव न घेता टिका केली. तर, सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयावर होणाऱ्या टीकेवरुनही विरोधकांना, टिकाकारांना सुनावले. सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादावरही मोदी बोलले. तसेच, युक्रेनमधून भारतात परतलेल्या नागरिकांसाठी चालवलेल्या मोहिमेवरुन होत असलेल्या प्रांतवादाच्या टिकेवरुनही त्यांनी आपलं मत मांडलं.  

लोकशाही भारतीयांच्या नसानसात 

सध्या सुरू असलेल्या युद्धाचा प्रभाव जगावर होत आहे. मात्र, जे देश युद्ध लढत आहेत, त्यांच्याशी आर्थिक, सुरक्षा, शिक्षण, राजकीयदृष्टीतून भारताचं नातं आहे. सध्या तेल, गॅस, फर्टीलायजर, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. जगभरातील देशांमध्ये महागाई वाढत आहे. या कठिण परिस्थितीतही यंदाच्या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास भारत आत्मनिर्भर होत असल्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. जगभरातील या अनिश्चितेच्या वातावरणात भारताच्या जनतेनं, विशेषत: उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला आहे. या निवडणुकीत लोकांना स्थीर सरकारसाठी मतदान केले, म्हणजे लोकशाही भारतीयांच्या नसानसात आहे. 

ऑपरेशन गंगा मोहिमेला प्रांतवादाशी जोडलं

युक्रेनमध्ये भारताचे हजारो नागरिक अडकले होते, तेव्हाही देशातील काहीजणांनी भारताचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे 'ऑपरेशन गंगा' या मोहिमेलाही प्रांतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीला जातीवाद, प्रदेशवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला, ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे, असे मोदींनी म्हटले. मी निवडणुकांमध्येही विकासाच्याच गोष्टी केल्या. गरिबांना घर, गरिबांची प्रगती, विकास याच मुद्द्यावर मी भाष्य केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपBJPभाजपाElectionनिवडणूकPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२