शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Narendra Modi: कोरोना निर्बंध उठताच रोजगार दुप्पटीने वाढला, वर्षात 1 कोटी 20 लाख नवे जॉब्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 12:20 PM

ईपीएफओवरुन देशातील रोजगार निर्मित्तीची एकदम योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळते. त्यानुसार देशात 2021 मध्ये जवळपास 1 कोटी 20 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत.

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना देशातील कोरोना परिस्थितीवर केंद्र सरकारने केलेल्या कार्याची माहिती दिली. लोकसभेत बोलताना मोदींनी केंद्र सरकारने गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील गरीबांना मोफत धान्यवाटप केल्याचं सांगितलं. कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी ठरलो, त्यानंतर आता रोजगारनिर्मित्तही वाढ झाल्याचे मोदींनी सांगितले. राज्यसभेत बोलताना मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

ईपीएफओवरुन देशातील रोजगार निर्मित्तीची एकदम योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळते. त्यानुसार देशात 2021 मध्ये जवळपास 1 कोटी 20 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. हे सर्व फॉर्मल जॉब्स आहेत, इनफॉर्मल नाहीत. त्यामध्ये 60 ते 65 लाख नोकरदार हे 18 ते 25 वर्षे वयाची तरुणपिढी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना सांगितले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदींनी कोविड आणि कोविडनंतरच्या देशातील स्थितीचं वर्णन केलं. तसेच, कोरोनानंतर रोजगारनिर्मित्तीत वाढ झाल्याचंही सांगितलं.  

नेसकॉमच्या अहवालानुसार कोरोनाच्या पहिल्या तुलनेत कोविड निर्बंध उठवल्यानंतर दुप्पटीनं नोकर भरती होत आहे. नेसकॉमच्या डेटानुसार 2017 नंतर गेल्या वर्षभरात 27 लाख जॉब्स आयटी सेक्टरमध्ये उपलब्ध झाले आहेत. आयटी सेक्टरमध्ये काम करणारे हा वरिष्ठ स्तरावरील वर्ग असतो. म्हणजे, देशातून ग्लोबल एक्सपोर्ट वाढला असून रोजगार निर्माण झाल्याचे मोदींनी सांगितले. एमएसएमई सेक्टरच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रात वाढ झाली असून नवीन रोजगार निर्मित्ती झाली आहे. सन 2021 मध्ये केवळ एका वर्षात भारताने जेवढे युनिकॉर्न बनवले आहेत, ते देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त आहेत. जर हे रोजगारनिर्मित्तीत येत नसेल, तर रोजगारापेक्षा राजकारणाची सर्वाधिक तुलना होईल, असेही मोदींनी राज्यसभेत बोलताना म्हटले.

मोबाईल उत्पादनात भारताचा पहिला नंबर  

मोबाईल उत्पादनात भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ऑटोमोबाईल, बॅटरी निर्मितीत आपला समावेश अग्रगण्य देशांच्या यादीत होतो. इंजिनीयरिंग उत्पादनांची निर्यात वाढली आहे. हे आपल्या देशाचं कौशल्य आहे. संकटाला आपण धीरानं सामोरे गेलो. त्याचं श्रेय देशवासीयांना जातं. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी केलेलं काम तर अतिशय कौतुकास्पद आहे. मी त्यांचे आभार मानतो, असं मोदींनी म्हटलं.

80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं

कोरोना काळात कोणकोणती कामं झाली त्याची यादी मोठी आहे. लॉकडाऊन काळात कोणी उपाशी राहू नये यासाठी ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिलं. लाखो लोकांना घरं दिली. घरासाठी येणारा खर्च पाहता आता या व्यक्ती लखपती झाल्या असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. ५ कोटी ग्रामीण कुटुंबाना नळातून पाणी पुरवलं. कोरोना काळात ग्रामीण भागाला लॉकडाऊनपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम दिसला. शेतकऱ्यांनी बंपर उत्पादन घेतलं आणि अर्थव्यवस्थेला हात दिला, असं म्हणत मोदींनी शेतकऱ्यांचे आभार मान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीUnemploymentबेरोजगारी