शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 6:08 PM

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या यू-टर्नवरुन राहुल गांधींची बोचरी टीका

Rahul Gandhi On Kangana Ranaut: भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. भाजप पुन्हा शेतकरीविरोधी तिन्ही काळे कायदे आणणार असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट प्रश्न विचारला आहे. 

'पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागेल'भाजपवर आरोप करताना काँग्रेस राहुल गांधी म्हणाले की, "700 हून अधिक शेतकरी, विशेषत: हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी शहीद झाले. तरीदेखील भाजपचे लोक समाधानी नाहीत. इंडिया आघाडी देशाच्या अन्नदात्यांविरोधातील भाजपचा एकही कट यशस्वी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान करणारे कोणतेही पाऊल उचलले गेले, तर नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल," असे राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

कंगना रणौतने काय म्हटले?भाजप खासदार कंगना रणौत यांनी तीन कृषी कायदे परत आणले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी स्वतःच त्याची मागणी करावी, असे म्हटले होते. विशेष म्हणजे, या विधानाला भाजपच्या मित्र पक्षानेही विरोध केला. यामुळे अखेर कंगनाला आपले वक्तव्य मागे घ्यावे लागले. हे माझे वैयक्तिक विधान आहे, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे कंगनाने म्हटले. दरम्यान, हरियाणामध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राज्यात शेतकऱ्यांचा मुद्दा प्रमुख आहे, त्यामुळे भाजपला कुठलाही धोका पत्करायचा नाही.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसKangana Ranautकंगना राणौत