शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 06:53 IST

Narendra Modi In PMO: इच्छा   स्थिरता = संकल्प, संकल्प   परिश्रम = सिद्धी असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिला. ते म्हणाले की, देशातील व्यवस्थेमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी व कामे पार पाडण्याची गती वाढविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 नवी दिल्ली  -  इच्छा   स्थिरता = संकल्प, संकल्प   परिश्रम = सिद्धी असा कानमंत्र पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिला. ते म्हणाले की, देशातील व्यवस्थेमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी व कामे पार पाडण्याची गती वाढविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान कार्यालय हे एक सत्ताकेंद्र म्हणून ओळखले जात होते, असाही दावा त्यांनी केला. 

मोदी म्हणाले की, देशाला सर्वांत पहिले स्थान हे माझे ध्येय असून, विकसित भारत निर्माण करणे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील हेच उद्दिष्ट समोर राखावे, असे आवाहन मोदी यांनी केले. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी देशासाठी समर्पित केला आहे. २०४७ साली विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अहोरात्र काम करण्याचे वचन जनतेला दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाने नरेंद्र मोदी यांची नव्हे तर जनतेची सेवा करणे अपेक्षित आहे. मी सत्ताधीश होण्यासाठी जन्माला आलेलो नाही किंवा सत्ता मिळविणे हे माझे कधी उद्दिष्टही नव्हते, असेही ते म्हणाले.

...म्हणून मला पुन्हा संधीमोदी यांनी सांगितले की, देशातील १४० कोटी लोकांचा विचार सतत माझ्या मनात असतो. जनता ही मला देवासमान आहे. लोकसभा निवडणुकांतील प्रचाराच्या काळात जनतेचे सामर्थ्य, समर्पण वृत्ती व नवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेत असलेली ऊर्जा या सर्वांचे मला दर्शन झाले. त्यामुळेच जनतेने मला पुन्हा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील माझे सर्व सहकारी पूर्वीप्रमाणेच पुढील काळातही कार्यरत राहाणार आहेत. राष्ट्र उभारणीसाठी आपले योगदान देणार आहेत.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनीदेखील राष्ट्रउभारणीच्या कार्यात आपले योगदान दिले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या योगदानावर शिक्कामोर्तब केले आहे.

...म्हणून मला पुन्हा संधीमोदी यांनी सांगितले की, देशातील १४० कोटी लोकांचा विचार सतत माझ्या मनात असतो. जनता ही मला देवासमान आहे. लोकसभा निवडणुकांतील प्रचाराच्या काळात जनतेचे सामर्थ्य, समर्पण वृत्ती व नवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेत असलेली ऊर्जा या सर्वांचे मला दर्शन झाले. त्यामुळेच जनतेने मला पुन्हा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील माझे सर्व सहकारी पूर्वीप्रमाणेच पुढील काळातही कार्यरत राहाणार आहेत. राष्ट्र उभारणीसाठी आपले योगदान देणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकार