शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
3
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
4
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
5
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
6
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
7
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
8
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
10
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
11
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
13
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
14
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
15
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
16
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
17
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
18
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
19
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
20
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं

Narendra Modi Interview: काँग्रेस देशाच्या मुख्य प्रवाहात राहिली तर...; पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 8:12 PM

जय-पराजय आम्ही दोन्ही पाहिलेत. आम्ही जेव्हा विजयी होतो तेव्हा जास्तीत जास्त जमिनीशी नाळ तुटू न देण्याचा आम्ही प्रयत्न करतो असं मोदींनी सांगितले.

नवी दिल्ली – जातीयवाद, भाषिकवाद, प्रांतवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार हे काँग्रेसच्या कार्यशैलीचा आणि विचारसरणीचा आधार आहे. हे या देशाच्या मुख्य प्रवाहात राहिले तर देशाचे किती मोठे नुकसान आहे. देशाची आज जी अवस्था झाली त्याला सर्वात जास्त जबाबदार काँग्रेस आहे. या देशात जितके पंतप्रधान होते, मी, अटल बिहारी वाजपेयी सोडून सर्व काँग्रेसच्या शाळेतीलच आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने अनेक पराभव पाहिले. त्यातून विजय मिळवला. आम्ही जय-पराजय पाहिले, डिपॉझिट जप्त होतानाही पाहिले. एकेवेळी भाजपा नव्हता. मी राजकारणात नव्हतो. त्यावेळी जनसंघ होता. अनेक ठिकाणी मिठाई वाटप सुरु होते. निवडणुकीत हरल्यानंतरही मिठाई का वाटत होते असा आम्हाला प्रश्न पडला. तेव्हा कळालं की आमच्या ३ लोकांचे डिपॉझिट वाचलं म्हणून मिठाई वाटतायेत आम्ही ते दिवस पाहिलेत असं त्यांनी सांगितले.  

त्यामुळे जय-पराजय आम्ही दोन्ही पाहिलेत. आम्ही जेव्हा विजयी होतो तेव्हा जास्तीत जास्त जमिनीशी नाळ तुटू न देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही निवडणूक जिंकलो तरी लोकांची मनं जिंकण्यात कुठेही कमी पडत नाही. आम्ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षण, योजना, काम जनतेचं मन जिंकण्याचं काम करतो. ज्या गोष्टीतून लोकांना समाधान मिळतं आम्ही तेच करतो असंही मोदींनी सांगितले. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नेहरुंच्या विधानावर मोदींचे स्पष्टीकरण

मी कुणाच्या आईवडिलांना, आजी-आजोबांना काही बोललो नाही. मी देशाच्या पंतप्रधानांनी काय म्हटलं ते सांगितले. मी म्हटलं होतं की, एका पंतप्रधानांचे विचार काय होते तेव्हा काय स्थिती होती. आणि आज पंतप्रधानांचे विचार काय आहेत आणि स्थिती काय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित जवाहरलाल नेहरुंवरील चर्चेवर स्पष्टीकरण दिले.

आम्हाला ५ राज्यांत सेवा करण्याची संधी मिळेल

मी या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व राज्यांना पाहतोय. भाजपाची लाट आहे. प्रचंड बहुमताने भाजपा जिंकेल. या ५ राज्यातील जनता भाजपाला सेवा करण्याची संधी देईल. ज्या राज्यांत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेने आम्हाला ओळखलं आहे. आमच्या कामाला पाहिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनासाठी आप, काँग्रेस जबाबदार

कोविड महामारीत सर्व म्हणत होते जिथे आहात तिथेच राहा. काँग्रेसनं लोकांना फ्री तिकीट देऊन प्रवास करण्यास प्रोत्साहन दिले. दिल्लीत आम आदमी पक्षानेही व्हॅनमध्ये भरभरुन झोपड्यांमधील लोकांना सांगितले तुम्ही लवकर जा, इथं लॉकडाऊन होणार आहे असं सांगत कोरोनासाठी आप, काँग्रेसला जबाबदार धरलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा