शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 13:48 IST

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात डिजिटल अटकेपासून बचावाची माहिती दिली.

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(दि. 27) 115 व्या 'मन की बात' कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या डिजिटल अरेस्टच्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि लोकांना जागरुक केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये पोलिसांचे कपडे घातलेला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची ऑनलाईन पद्धतीने चौकशी करत आहे आणि त्याला आधार कार्ड दाखवण्याची मागणी करतोय.

डिजिटल अरेस्टवर पीएम मोदींनी केले जागरुकडिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक वयोगटातील आणि वर्गातील लोक डिजिटल अटकेचे बळी ठरत आहेत. भीतीपोटी अनेकजण आपल्या कष्टाने कमावलेले पैसे या ऑनलाईन गुन्हेगारांना देत आहेत. लोकांना जागरुक करत पीएम मोदी म्हणाले की, तुम्हाला कधी असा फोन आला तर घाबरू नका. तपास यंत्रणा कधीही अशाप्रकारचे फोन किंवा व्हिडिओ करत नाहीत. तमाम भारतीयांना अशा घोटाळ्यापासून सावध राहावे.

डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पेकायद्यात डिजिटल अटकेसारखी कोणतीही व्यवस्था नाही, ही फसवणूक, खोटेपणा आहे. डिजिटल अटकेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी सर्व तपास यंत्रणा राज्य सरकारांसोबत एकत्र काम करत आहेत. पीएम मोदींनी यावेळी डिजिटल अटकेपासून बचावाचे तीन टप्पे सांगितले. 

  1. थांबा/शांत राहा
  2. विचार करा
  3. योग्य कारवाई करा

 

पंतप्रधान म्हणाले की, असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा, घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका, तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा. दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही. तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून घ्या की काहीतरी चुकीचे आहे. शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले, तिसरा टप्पा म्हणजे योग्य कारवाई. अशाप्रकारचे फोन आल्यावर नॅशनल सायबर हेल्पलाइन 1930 डायल करा. तसेच सायबर क्राईम वेबसाइटवर अहवाल द्या. कुटुंब आणि पोलिसांना कळवा.

अशी केली जाते डिजिटल अरेस्टडिजिटल अटक घोटाळ्याची सुरुवात एका अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलने होते. हा ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल असू शकतो. पीडितेला अज्ञात क्रमांकावरून कॉल किंवा व्हिडिओ कॉल येतो आणि त्यांना बनावट पार्सल, मोबाईल क्रमांक बंद करणे किंवा बनावट मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची माहिती दिली जाते. यानंतर, त्यांना बनावट अटक किंवा बनावट वॉरंट दाखवले जाते. यानंतर त्यांना प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. अशाप्रकारे हजारो, लाखो रुपये उकळले जातात.

तक्रार कशी करायची?पीएम म्हणाले की, अशी फसवणूक करणारे हजारो व्हिडिओ आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. लाखो सिमकार्ड आणि बँक खातीही ब्लॉक करण्यात आली आहेत. एजन्सी त्यांचे काम करत आहेत, परंतु डिजिटल अटकेच्या नावाखाली होणारे घोटाळे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जागरूकता खूप महत्त्वाची आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, तुमच्यासोबत झालेला घोटाळा #SAFEDIGITALINDIA हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना जागरूक करा. डिजिटल अटक घोटाळा किंवा इतर सायबर फसवणुकीबद्दलच्या तक्रारी नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (cybercrime.gov.in/) किंवा हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून नोंदवल्या जाऊ शकतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcyber crimeसायबर क्राइम