शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

Narendra Modi: कोविडकाळात मोदींनी जमिनीवरचं काम केलंय, खा. राणांकडून पंतप्रधानांचं कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 4:42 PM

खासदार राणा यांनी मोदींवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. मोदींनी पालखी मार्ग महराष्ट्रात दिला.

नवी दिल्ली - लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसने कोरोना काळात हद्द पार केल्याचा आरोप केला. कोरोना देशभरात काँग्रेसने पसरविल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोदींच्या या आरोपामुळे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मोदींवर टीका केली. मात्र, आता खासदार नवनीत राणा यांनी मोदींची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे. 

खासदार राणा यांनी मोदींवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. मोदींनी पालखी मार्ग महराष्ट्रात दिला. 12,294 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे, ज्या मार्गाचा वापर देशातील सर्वच भक्त आणि महाराष्ट्राची जनता भविष्यात करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या पालखीमार्गाचे भूमीपूजन झाले. समृद्धी महामार्गालाही केंद्र सरकारने पैसे दिले, नागपूर-मुंबईला जोडणार हा मार्ग आहे. 701 किमीचा हा रस्ता असून अंदाजे 55 हजार कोटी रुपये यासाठी खर्च येणार आहे. या रस्त्याचं काम केंद्र सरकारने केलं आणि नाव देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केल्याचं राणा यांनी म्हटलं. 

महाराष्ट्रात नवीन रेल्वे लाईन, अनेक मेट्रो प्रोजेक्टही सरकारने केले. उडान योजनेंतर्गत आता नुकतेच सिंधुदुर्गात विमानतळ बनविण्यात आले आहे. नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथेही उद्घाटन झाले आहेत. पंतप्रधानांनी कोविड काळात हात वर नाहीत केले, तर जमिनीवरचं काम केलंय. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी केवळ आरोप केले, ते शेतकऱ्यांवर बोलले नाहीत, ते गरिबांबाबत बोलले नाहीत, ना घरकुलबाबत बोलले, ना इंडस्ट्रीबाबत बोलले, असे म्हणत शिवसेनेवरही हल्लाबोल केला. 

काँग्रेसचा तीव्र संताप

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी संसदेत करोना प्रसाराबाबत काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. नागपुरातील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन' करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला. तर, अमरावतीतही काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसून आलं. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी कोविड काळातील कामाचे फोटो शेअर करत मोदींना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

काय म्हणाले होते मोदी

पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतू काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना