शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

... त्यांना मोदींनीच सांगितलं असावं, शेवाळेंच्या गौप्यस्फोटावर राऊतांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 20:07 IST

उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात. महाविकास आघाडीवेळीही सर्वांना विश्वासात घेतलं होतं

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, आता 12 शिवसेना खासदारांचाही गट एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहे. राजधानी दिल्लीत आज एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांची भेट घेतली. शिवसेनेतील बंडाच्या या राजकीय घडामोडीत खासदार संजय राऊत हे केंद्रस्थानी आहेत. शिवसेना खासदारांनी संजय राऊत यांच्यामुळेच युतीची चर्चा फिस्कटल्याचे सांगितले. तसेच, युतीसंदर्भात मौठा गौप्यस्फोटही केला होता. आता, या गौप्यस्फोटावर शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात. महाविकास आघाडीवेळीही सर्वांना विश्वासात घेतलं होतं, त्यावेळी या सर्वांनी निर्णयाचं स्वागत केलं होतं. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात बंद खोलीत जी चर्चा झाली, त्यातील बराचसा भाग उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितला होता. ठाकरे कुटुंब आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत. त्यामुळे, जो कोणी हा गौप्यस्फोट केलाय, त्यांना अधिक माहिती असेल. किंवा मोदींनीच त्यांना ही माहिती सांगितली असेल, असे म्हणत संजय राऊत यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या गौप्यस्फोटावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

भाजपामुळेच युती तुटली

शिवसेना-भाजपा युती तुटण्यास शिवसेना जबाबदार नाही. सन 2014 आणि 2019 मध्ये युती ही भाजपमुळेच तुटली, शिवसेनेमुळे नाही. त्यावेळी, हे सर्व खासदार कुठं होते, असेही संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर टिका झाली. त्यावेळी, हे सर्व खासदार कुठे होते. त्यांनी या टिकेला प्रत्युत्तर का दिले नाही. पण, या टिकाकारांवर आम्ही तुटून पडलो, आम्ही पक्षाची भूमिका मांडली, असेही संजय राऊत यांनी म्हटलं.  

राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे स्वत: भाजपासोबत युतीसाठी आग्रही होते. पण, खासदार संजय राऊत यांनी खोडा घातला असा घणाघाती आरोप राहुल शेवाळे यांनी केला. विशेष म्हणजे युतीसाठी उद्धव ठाकरे जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यावेळी त्यांनी तासभर चर्चाही केली होती. मात्र, पुढच्या जुलै महिन्यात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे, ही बोलणी पुढे सरकलीच नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी