शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:59 IST

Narendra Modi Speech In Lok Sabha: सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत गुंडाळले गेल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झाल्याचं चित्र रंगवण्यात व्यस्त आहे, असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला. 

लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भापजपाला बहुमताने हुलकावणी दिल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीमधील घटक पक्षांनी अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत होते. त्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सभागृहामधून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला आज मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत गुंडाळले गेल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झाल्याचं चित्र रंगवण्यात व्यस्त आहे, असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला. 

लोकसेभमध्ये संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या. सलग तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसने आपला पराभव स्वीकार करून, जनादेश मान्य करून आत्मचिंतन केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र सध्या त्यांच्याकडून शीर्षासन घालण्याचे प्रकार सुरू आहेत. काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झालाय, अस चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोला मोदींनी लगावला. 

नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले की, १९८४ नंतर आतापर्यंत १० लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. मात्र त्यामध्ये एकदाही काँग्रेसला २५० जागाही जिंकता आलेल्या नाही. यावेळी काँग्रेसवाले ९९ जागांच्या फेऱ्यात अडकले. एक मुलगा ९९ गुण दाखवून मिठाई वाटत फिरत होता. लोकही शाबासकी द्यायचे. मात्र जेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला पाहिलं तेव्हा त्यांनी याला १०० पैकी ९९ नाही तर ५४३ पैकी ९९ गुण मिळाले आहेत, असं सांगितलं, अशा शब्दात मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा समाचार घेतला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी