शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

पंतप्रधान मोदींच्या ट्वीटवरून कमलनाथांनी सुनावले, पीएमओकडून तासाभरात उत्तर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 13:52 IST

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (16 एप्रिल) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला.मोदींच्या या ट्वीटवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कमलनाथ यांनी ट्वीट केल्यानंतर पीएमओकडून तासाभरात उत्तर आले.

नवी दिल्ली - मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (16 एप्रिल) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या ट्वीटवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कमलनाथ यांनी ट्वीट केल्यानंतर पीएमओकडून तासाभरात उत्तर आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (17 एप्रिल) सकाळी नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं ट्वीट केलं होतं. यामध्ये गुजरातमधील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र मोदींच्या या ट्वीटनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदींवर नुकसान भरपाईवरून भेदभाव करण्याचा आरोप केला आहे. तसेच नुकसान भरपाई ही केवळ गुजरातसाठीच आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. 

'मोदीजी, तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात. मध्य प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तुमची भावनिकता ही केवळ गुजरातपुरतीच मर्यादीत आहे का? तुमच्या पक्षाचे सरकार असले तरी मध्य प्रदेशमध्येही लोक राहतात' असं ट्वीट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे. 

कमलनाथ यांच्या ट्वीटनंतर तासाभरातच पंतप्रधान कार्यालयाने पुन्हा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि अन्य राज्यातील मुसळधार पावसात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि  गुजरात या राज्यांमध्ये हवामान विभागाने वादळाचा अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशातली झाबुआ येथे अचानक हवामान बदलल्यानंतर मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत.उदयपूर आणि झालावड येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदयपूरमध्ये विजेचे जवळपास 800 खांब आणि 70 ट्रान्सफॉर्मर कोसळले. अहमदाबाद, राजकोट, महेसाणा, साबरकांठा, आणंद भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशGujaratगुजरातRajasthanराजस्थानRainपाऊसDeathमृत्यू