शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

नरेंद्र मोदींमध्ये असुरक्षिततेची भावना, खोटेपणा त्यांच्या सरकारची ओळख - अरुण शौरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 13:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मोठया प्रमाणावर असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात मोठया प्रमाणावर अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे.

ठळक मुद्देमोदी असुरक्षित असल्यामुळे पंतप्रधान कार्यालय कमकुवत आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना स्वत:चा जनाधार नाहीय.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मोठया प्रमाणावर असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात मोठया प्रमाणावर अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे. मी आजच्या इतके कुठलेही पंतप्रधान कार्यालय कमकुवत पाहिलेले नाही अशा शब्दात प्रसिद्ध पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी मोदी सरकारवर टीका केली. 

अरुण शौरी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. खोटेपणा ही मोदी सरकारची ओळख आहे. नोक-या निर्मिती आणि अन्य आघाडयांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. नवी दिल्लीत आयोजित 'टाइम्स लिट फेस्ट'मध्ये ते बोलत होते. जी व्यक्ती मानसिक दृष्टया सुरक्षित आहे ती व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत निराश होणार नाही आणि ज्या व्यक्तीमध्ये असुरक्षिततेची भावना आहे अशी व्यक्ती जो तज्ञ आहे, ज्याला एखाद्या विषयातले कळते त्याला स्वत:च्या जवळ येऊ देणार नाही. 

आज गाढव घोडे बनले आहेत आणि नेते ठरवू शकतात त्यांना कोणाबरोबर रहायच आहे असे शौरी म्हणाले. मोदी असुरक्षित असल्यामुळे पंतप्रधान कार्यालय कमकुवत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना स्वत:चा जनाधार नाहीय. त्यामुळे त्यांच्यापासून मोदींना काहीही धोका नाही असे शौरी म्हणाले. टीकेच्या बाबतीत मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार अत्यंत संवेदनशील आहे असे शौरी म्हणाले. अरुण शौरी, यशवंत सिन्हा हे मोदी सरकारचे विरोधक समजले जातात. दोघांनी यापूर्वीही अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. 

मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन दोनवर्षांपूर्वी एका मुलाखतीत नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष  अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे तिघेच आज भाजपा चालवत आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली होती. या तिघांनी वेळोवळी विरोधकांचा उपमर्द तर केलाच पण स्वपक्षीयांच्या मनातही भीती निर्माण केल्याचा आरोप शौरी यांनी केला होता. योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचत नसल्याने आवश्यक तिथे बदल होत नाहीत, असे मत त्यांनी नोंदवले. तसेच मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सरकारचा कारभार काही बाबतीत चांगला असला तरी आर्थिक चित्र पालटण्याचे आश्वासन मात्र पाळण्यात आलेलं नाही, असही शौरी यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Arun Shourieअरुण शौरीNarendra Modiनरेंद्र मोदी