शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

PM Modi: भारतात परत या, त्याशिवाय पर्याय नाही! पंतप्रधान मोदींचा कर्जबुडव्या उद्योजकांना सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 19:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या उद्योगपतींना सज्जड दम भरला आहे.

नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या उद्योगपतींना सज्जड दम भरला आहे. देश सोडून पळालेल्या सर्व पळपुट्या कर्जबुडव्यांना परत आणण्यासाठी सरकार शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही उद्योगपतीचं थेट नाव घेणं टाळलं. कर्ज बुडवून परदेशात पळालेल्यांसमोर भारतात परतण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असंही मोदी म्हणाले. ते कर्ज प्रवाह आणि आर्थिक वाढीवर आजोयित एका चर्चेला संबोधित करत होते. 

"पळपुट्या आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीरबाबींचा अवलंब करत आहोत आणि लवकरच त्यात यशही येईल. त्यांना माझा एकच आणि स्पष्ट संदेश आहे की भारतात परत या कारण तुम्हाला परत आणण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहणार आहेत. ते काही थांबणार नाहीत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

विजय मल्ल्या आणि नीरव मोदींना इशारापंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात उद्योगपतींच्या नावाचा थेट उल्लेख केलेला नसला तरी त्यांचा रोख विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या पळपुट्या उद्योगपतींकडे होता. आतापर्यंत चुकीचं काम केलेल्यांकडून ५ लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात आलेली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. 

बँका अधिक सक्षम होणारकेंद्रात २०१४ साली भाजपाचं सरकार आल्यानंतर बँका अधिक सक्षम झाल्याचा दावा मोदींनी यावेळी केला आहे. "देशाच्या अर्थव्यवस्थाला नवी ऊर्जा देण्यासाठी बँका आता मजबूत स्थितीत काम करत आहेत. यामुळे भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी खूप मदत होणार आहे", असं मोदी म्हणाले. बँकांनी आता स्वत:सोबतच देशाचं ताळेबंद खात्यांची स्थिती सुधारण्यासाठी सक्रियतेनं काम करायला हवं असंही मोदी म्हणाले. 

बँकांना दिला मोलाचा सल्लाबँकांनी आपलं क्षेत्र विस्तार करण्यासाठी आता जुन्हाय संस्कृतीचा त्याग करुन कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठीच्या दृष्टीकोनात सकारात्मक पद्धतीनं विचार करायला हवा. बँकांनी व्यावसायिक जगतासोबतच भागीदारी मॉडेलवरही काम करायला हवं असा सल्ला मोदींनी बँकांना दिला आहे. 

बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचावंबँकांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या प्रगतीसाठी आवश्यकतेनुसार ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवं. ग्राहकांनी बँकेत येण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवं, असंही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBanking Sectorबँकिंग क्षेत्रNirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्या