शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

५७ मंत्र्यांसह नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 04:14 IST

या मंत्रिमंडळात भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि निवृत्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश हे मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात सुमारे साडेसहा हजार मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी नाव घोषित करण्यात आले आणि त्याबरोबर सर्व बाजूंनी मोदी यांच्या जयजयकाराला सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि त्यांच्या ५७ सहकाऱ्यांना मंत्री व राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. या शपथविधी समारंभास आलेल्या भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या व कार्यकर्त्याच्या चेहºयावर कमालीचा आनंद दिसत होता. ठरल्याप्रमाणे रात्री ९ वाजता शपथविधी समारंभाची सांगता झाली.

या मंत्रिमंडळात भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि निवृत्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश हे मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य आहे. मात्र या वेळी अरुण जेटली व सुषमा स्वराज यांचा प्रकृतीच्या कारणास्तव समावेश नाही.

जे. पी. नड्डा, विजय गोयल, जयंत सिन्हा, राजीव प्रताप रुडी, के. अल्फान्स, मनेका गांधी व महेश शर्मा, राज्यवर्धन राठोड यांच्यासह गेल्या मंत्रिमंडळातील ३0 जणांना यंदा स्थान मिळालेले नाही.

महाराष्ट्राचे ‘सात’ साथ है!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा वाटा एकने कमी झाला असून सात जणांना संधी देण्यात आली आहे. त्यात विद्यमान मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विदर्भातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पदाची संधी देण्यात आली.

महाराष्ट्रातून भाजपचे पाच तर शिवसेना आणि रिपाइंचे प्रत्येकी एक मंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभे राहिल्याचे बक्षीस रामदास आठवले यांना मिळाले. यापूर्वी महाराष्ट्रातून आठ मंत्री होते. आता सात आहेत. शिवसेना आणि रिपाइंचे प्रत्येकी एक मंत्रीपद कायम आहे. याचा अर्थ भाजपच्या वाट्याचे एक मंत्रीपद कमी झाले आहे. गेल्या वेळी मंत्री असलेले अनंत गीते आणि हंसराज अहीर या वेळी पराभूत झाले आहेत.

गेल्या वेळी रेल्वे आणि वाणिज्य मंत्री राहिलेले सुरेश प्रभू यांना वगळण्यात आले आहे. राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे धुळे मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले असले तरी त्यांना दुसऱ्यांदा संधी नाकारण्यात आली आहे. यावेळी संधी मिळालेल्यांपैकी सातपैकी पाच जण हे शहरी भागातील नेते आहेत तर दोघे (रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे) ग्रामीण भागातील नेते आहेत. दानवे सलग पाचव्यांदा तर धोत्रे चौथ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. गडकरी, सावंत, दानवे आणि धोत्रे हे चौघे लोकसभेचे तर जावडेकर, गोयल आणि आठवले हे राज्यसभेचे सदस्य आहेत.

१८ खासदार असलेल्या शिवसेनेने तीन मंत्रीपदे मागितली असल्याचे म्हटले जात होते. प्रत्यक्षात या पक्षाला एकच मंत्रीपद देण्यात आले. दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. सावंत यांची ओळख कामगार नेते अशी असून ते निष्ठावान शिवसैनिक व उत्तम वक्ते आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधी