शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
6
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
7
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
8
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
9
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
10
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
11
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
12
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
13
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
14
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
15
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
16
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
17
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
18
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
19
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
20
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video

नर्मदेच्या बॅक वॉटरने केला घात

By admin | Published: August 05, 2015 11:29 PM

मध्यप्रदेशातील दुहेरी रेल्वे अपघात मुसळधार पावसामुळे झाल्याचे मानले जात असले तरी नर्मदेवरील धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने ही भीषण घटना घडली

राजेंद्र पाराशर, भोपाळमध्यप्रदेशातील दुहेरी रेल्वे अपघात मुसळधार पावसामुळे झाल्याचे मानले जात असले तरी नर्मदेवरील धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने ही भीषण घटना घडली असण्याची शक्यता अधिक आहे. नर्मदा नदीवरील धरणातून सतत पाणी सोडण्यात येत असल्याने तिच्या उपनद्यांमधील पाण्याची पातळी वाढते आणि हे पाणी उपनद्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरते. मंगळवारी रात्री झालेल्या अपघातामागेही नदीत अचानक वाढलेली पाण्याची पातळी हेच मूळ कारण असावे. या पाण्यामुळे रेल्वेरुळावरील माती खचली आणि अपघात झाला. नर्मदेवर बांधण्यात आलेल्या धरणांमधून (जबलपुरातील बरगी, होशंगाबाद जिल्ह्यातील तवा) सतत सोडण्यात येणारे पाणी आणि इंदिरा सागर व ओंकारेश्वर धरणात होणारा जलसाठासुद्धा अपघातास कारणीभूत ठरला आहे. अपघाताच्या वेळी बरगी धरणातून पावणेसात मीटर, तर तवामधून दोन मीटर पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नर्मदेच्या उपनद्यांमधील बॅक वॉटर वाढले आहे. हेच बॅक वॉटर रेल्वेमार्गाची जमीन ठिसूळ करीत आहे. हरदाजवळ ही घटना घडली ते स्थळसुद्धा काली माचक नदीच्या जवळ आहे. पावसाळ्यात या नदीतील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असते. सरकार हे संपूर्ण बुडीत क्षेत्र मानत नसले तरी हरदा जिल्ह्यातील अनेक गावे आजही बुडीत क्षेत्रात येतात; परंतु सरकारला अद्याप याचे गांभीर्य उमजलेले नाही. गावकऱ्यांनी यासाठी अनेकदा धरणे आंदोलन केले आहे.कसा झाला अपघात?मंगळवारी रात्री ११.३० वाजता सर्वप्रथम मुंबईहून वाराणसीला जाणारी कामयानी एक्स्प्रेस पुलावरून गेली. जमीन खचल्याने रेल्वेमार्ग तुटला आणि ११ डबे रुळावरून खाली घसरले. ६ डब्यांचे अधिक नुकसान झाले. त्यानंतर २० मिनिटांनी म्हणजे ११.५० वाजता पुलावरीलच दुसऱ्या रेल्वे रुळावरून आलेल्या पाटणा-मुंबई जनता एक्स्प्रेसचेही ९ डबे आणि इंजिन अपघातग्रस्त झाले. या गाडीचे चार डबे उद्ध्वस्त झाले.