शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

नशिराबादकरांना महिन्यातून ५ दिवसच मिळते पाणी ! विहिरींची पातळी खोल, नियोजनाच्या अभावामुळे टंचाईची झळ

By admin | Published: January 14, 2016 11:59 PM

नशिराबाद : संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन व्हावे, अशी ओरड होत असली तरी ग्रामपंचायतीने याबाबत ठोस पाऊले उचलले नसल्याने आतापासूनच ग्रामस्थांना टंचाईची झळ बसू लागली आहे. त्यातच पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी खोल गेल्याने गावाला सध्या ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिनाभरातून फक्त ४ ते ५ दिवसच पाणी मिळत आहे. जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यासाठी पर्यायी योजनेची मागणी होत आहे.

नशिराबाद : संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन व्हावे, अशी ओरड होत असली तरी ग्रामपंचायतीने याबाबत ठोस पाऊले उचलले नसल्याने आतापासूनच ग्रामस्थांना टंचाईची झळ बसू लागली आहे. त्यातच पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी खोल गेल्याने गावाला सध्या ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिनाभरातून फक्त ४ ते ५ दिवसच पाणी मिळत आहे. जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यासाठी पर्यायी योजनेची मागणी होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथे पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. एप्रिल-मे मध्ये टंचाईची भीषणता वाढत असते. त्यासाठी आतापासूनच संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन होणे आवश्यक आहे. सुमारे १७ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजना थंड बस्त्यात सुरू असून यंदाही शुद्ध पाण्यापासून नागरिकांना वंचित रहावे लागणार आहे.
बेळी, पेठ व अन्य जलस्त्रोतातून पाणीपुरवठा गावाला होत आहे. मात्र पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीपुरवठा करणार्‍या दिवसांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या गावाला ५ ते ६ दिवसाआड पाणी मिळत आहे.
नियोजन कोलमडले
येथे सार्वजनिक नळांना तोट्याच नाहीत. तसेच काही ठिकाणी खाजगी नळांना तोट्या नाहीत, उंटविडी गुदामाजवळ व्हॉल्व्हमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. गावात विविध ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत आहे; मात्र याबाबत ग्रामपंचायत सोयीस्कर दुर्लक्ष करीत नियोजनाचा अभाव समोर आणत आहे. पाणी बचतीबाबत उपाययोजना व्हावी ही अपेक्षा आहे. ग्रामस्थांकडून स्पेशल पाणीप˜ीचे वार्षिक आकारणी होऊनही सध्या महिनाभरात ४ ते ५ वेळा कमी दाबाने पाणी मिळत आहे.
अखेर धाव एमआयडीसीकडे?
पाणी टंचाईच्या काळात येथे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असतो. त्या पाण्यापोटी सुमारे कोट्यवधींची थकबाकीचा बोजा लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे सुमारे सव्वा कोटीवर आला आहे. पर्यायी योजनाच नसल्याने टंचाई निवारणासाठी अखेर एमआयडीसीच्या पाण्यावर भिस्त असते. जानेवारीपासूनच टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत असल्याने आता धाव एमआयडीसीकडेच असा प्रश्न समोर येत आहे.