शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

दिबाकर बॅनर्जी यांच्यासह १० दिग्दर्शकांकडून राष्ट्रीय पुरस्कार परत

By admin | Published: October 28, 2015 7:47 PM

साहित्यिकांकडून साहित्य अकादमी पुरस्कार सरकारला परत करुन देशातील असहिष्णू वातावरणाचा विरोध होत असतानाच आता चित्रपट दिग्दर्शकांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२८ - साहित्यिकांकडून साहित्य अकादमी पुरस्कार सरकारला परत करुन देशातील असहिष्णू वातावरणाचा विरोध होत असतानाच आता चित्रपट दिग्दर्शकांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.  
देशात सध्या असहिष्णू वातावरण असून ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, दादरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिऴविणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यासह दहा दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार परत करणार आहेत.  
यामध्ये दिबाकर बॅनर्जी यांच्यासह आनंद पटवर्धन, लिपिका सिंह, निष्ठा जैन, किर्ती नखवा, हर्ष कुलकर्णी, हरी नायर, परेश कामदार, विक्रांत पवार आणि प्रतीक वत्स यांचा समावेश आहे.