शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

गया येथे नक्षलवाद्यांचं तांडव; एकाच कुटुंबातील चौघांना फासावर लटकवलं आणि बॉम्बनं उडवलं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 11:35 AM

घटनास्थळी लावण्यात आलेले हे पत्रक जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या विषयावर कोणी फारसे बोलायला तयार नाही. गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

गया - बिहारमधील गया मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावात माओवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांची हत्या केल्याची घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी या चौघांनाही घराबाहेर फाशी दिली. हे चौघेही एकाच कुटुंबातील आहेत. एवढेच नाही, तर माओवाद्यांनी येथे एका घरालाही आग लावली आणि दुचाकीही जाळली.

मारल्या गेलेल्यांमध्येय सतेंद्र सिंह, महेंद्र सिंह, मनोरमा देवी आणि सुनीता सिंह यांचा समावेश आहे. यानंतर माओवाद्यांनी येथे एक पत्रक लावले. यावर लिहिले आहे की, मानवतेची हत्या करणारे आणि विश्वासघात करणाऱ्यांना मृत्यू दंडाशिवाय पर्याय नाही. हा अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या आमच्या चार सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला आहे. भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार आहे. त्यांना विष देण्यात आले होते.

घटनास्थळी लावण्यात आलेले हे पत्रक जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या विषयावर कोणी फारसे बोलायला तयार नाही. गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

यासंदर्भात बोलताना एसएसपी आदित्य कुमार म्हणाले, निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी नक्षलवाद्यांचे हे भ्याड कृत्य आहे. ज्या ठिकाणी चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले, त्याच ठिकाणी या हत्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBiharबिहारCrime Newsगुन्हेगारी